नवाब मलिक नवाब मलिक
देश

फडणवीसांना वंशवादाची उपज नाही का? नवाब मलिक यांचा सवाल

भाजपचा हा ढोंगीपणा आहे ते आपला वंशवाद लपवतात - मलिक

सकाळ डिजिटल टीम

भाजपचा हा ढोंगीपणा आहे ते आपला वंशवाद लपवतात - मलिक

सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणूकांची रणधुमाळी चालु आहे. देशभर या राज्यांच्या घडामोडींची चर्चा सुरु असून आता प्रचारही अंतिम टप्प्यात आले आहेत. त्यामुळे नेत्यांचे दौऱ्यांनीही वेग घेतला आहे. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) हेही गोव्यात प्रचारसाठी येणार आहेत. उद्या ते जाहीरनामा प्रसिद्ध करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यावेळी कुणाला बहुमत मिळणार नसून गोव्यात (Goa Election 2022) सर्व पक्षांना एकत्र यावे लागेल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.

यासंदर्भात ते म्हणाले, गोव्यात आज भाजपचे सरकार आहे. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला जनतेने नाकारले होते. काँग्रेस नेत्यांनी त्यावेळी मित्रपक्षांशी चर्चा केली नाही. त्यामुळे भाजपाने विजयाचा झेंडा फडकावला. भाजप यादीत मुख्यमंत्री सावंत (Pramod Sawant) सोडले तर इतर आमदार हे अन्य पक्षातून आणले आहेत. यावेळीही सावंत ताकदीने भाजपकडून निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी घराणेशाहीवर बोलतात, वंशवादाला विरोध असल्याचे ते भासवतात. तर मग युपीमध्ये एकाच कुटुंबातील ५६ तर गोव्यात दोन जोडप्यांना भाजपाकडून तिकीट दिले आहे. गोव्याचे प्रभारी फडणवीस आहेत घराणेशही नाही का? भाजपचा हा ढोंगीपणा आहे. भाजप आपला वंशवाद लपवतात, देवेंद्र फडणवीसांना वंशवादाची उमग नाही का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

यावेळी त्यांनी भाजप ढोंगी असल्याचा आरोप केला आहे. वंशवादाच्या नावावर भाजपची लिस्ट बघितली तर ही परंपरा भाजपचीच आहे. युपीमध्येही केंद्रीय मंत्र्यांना तिकीट दिले आहे. भाजपकडे आपली ताकद नाही. त्यांनी तोडफोड करून सरकार बनवले आहे. भाजपाने काँग्रेस नेत्यांना घेतले आणि सरकार स्थापन केले. जर का २०२४ मध्ये केंद्रात सरकार बदलले तर गोव्यात एकतरी आमदार राहील का? असेही त्यांनी विचारले आहे. पुढे ते म्हणाले, गोव्यातील टूरिझम ठप्प झाले आहे. रोजगार नाहीत. मात्र असे असतानाही सत्ता परिवर्तनानंतर आम्ही पब्लिक फ्रेंडली टूरिझम पॉलिसी आणू. गोव्यात भाजप सरकारला सत्तेपासून दूर नेण्यासाठी राष्ट्रवादीची भूमिका असे, असे सूचक विधान त्यांनी केले आहे.

यावेळी पंतप्रधान मोदींवर टीका करताना ते म्हणाले, नमस्ते ट्रंप कार्यक्रमासाठी विमान बंद केली नाहीत. थाळी वाजवा टाळा वाजवा. जनता कर्फ्यु पंतप्रधनांनी घोषित केले. सगळे अधिकार केंद्राने स्वतःकडे घेतले. आज म्हणतात आम्ही काही निर्णय घेतले नाहीत. त्यांनी जबाबदारीने वक्तव्य केली पाहिजेत. कोरोना काळात टिव्हीवर घोषणा केल्या आणि आता राज्यांवर खापर फोडत आहे. ही जबाबदारी मोदी सरकारची आहे. ते दिशाभूल करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुण्यात भाजपाच्या किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत ते म्हणाले, सोमय्या स्वतः घसरले आहेत. बॉडीगार्डने परिस्थिती हाताळली त्यात ते घसरले. कोणी हलला केला नाही. भाजप खोटे आरोप करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT