In Revised NCERT Textbook Esakal
देश

In Revised NCERT Textbook: 'बाबरी मशिदीचे नाव गायब! NCERTच्या नवीन पाठ्यपुस्तकात अयोध्या वादाचं पुनर्लेखन

In Revised NCERT Textbook: एनसीईआरटीने इयत्ता 12वीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकातील अयोध्या वादावरील प्रकरण लहान केले आहे. यामध्ये बाबरी मशिदीचे नाव काढून तिला तीन घुमट वास्तू असे संबोधण्यात आले आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

बारावीच्या सामाजिक शास्त्राच्या NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचे नावही हटवण्यात आले आहे. आता नवीन पुस्तकात याला 'तीन घुमट रचना' असे संबोधण्यात आले आहे. अयोध्येचा अध्याय चार पानांवरून फक्त दोन करण्यात आला आहे. यात भाजपची सोमनाथ ते अयोध्येपर्यंतची रथयात्रा, कारसेवकांची भूमिका, बाबरी मशीद पाडल्यानंतर झालेला हिंसाचार, राष्ट्रपती राजवट आणि अयोध्येतील हिंसाचाराबद्दल भाजपच्या खेदजनक बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, जुन्या पाठ्यपुस्तकात असे सांगण्यात आले आहे की, १६व्या शतकात मुघल सम्राट बाबरचा सेनापती मीर बाकी याने बाबरी मशीद बांधली होती. आता या अध्यायात श्रीरामाच्या जन्मस्थानी १५२८ मध्ये तीन घुमटाची रचना बांधण्यात आली असल्याचे सांगितले आहे. या संरचनेत अनेक हिंदू चिन्हे होती. याशिवाय आतील व बाहेरील भिंतींवर शिल्पे होती.

1986 मध्ये फैजाबाद जिल्हा न्यायालयाने मशीद उघडण्याच्या निर्णयानंतर जमाव कसा जमवला होता, हे जुन्या पुस्तकात दोन पानांत सांगण्यात आले होते. 1992 मध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी रथयात्रा आणि कार सेवेमुळे जातीय तणाव निर्माण झाला होता. यानंतर 1993 मध्ये जातीय दंगल झाली. यावेळी भाजपने अयोध्येतील घटनांवर दु:ख व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.

नवीन पुस्तकात काय आहे?

नवीन पुस्तकात म्हटले आहे की, 1986 मध्ये फैजाबाद जिल्हा न्यायालयाने तीन घुमटाची रचना उघडण्याचे आदेश दिले आणि लोकांना पूजा करण्याची परवानगी दिली. ही तीन घुमट रचना श्री राम जन्मस्थानी बांधली गेली असे मानले जाते. राम मंदिराची पायाभरणी झाली पण पुढच्या बांधकामावर बंदी घालण्यात आली.

हिंदू समाजाला वाटले की, त्यांच्या श्रद्धेशी छेडछाड केली जात आहे आणि मुस्लिम समाजाला संरचनेवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मिळत आहे. 1992 मध्ये संरचना कोसळल्यानंतर, अनेक टीकाकारांनी म्हटले की, हे लोकशाहीच्या तत्त्वांना मोठे आव्हान असल्याचे सिद्ध होईल.

अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा नव्या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने ही जमीन मंदिराच्या मालकीचा असल्याचा निकाल दिला. बाबरी पाडल्यानंतर कल्याण सिंह सरकार हटवण्याच्या आदेशाचा समावेश असलेल्या जुन्या पुस्तकात काही वृत्तपत्रांच्या कटिंग्जची फोटो समाविष्ट करण्यात आले होते. ते आता काढण्यात आले आहे.

2014 पासून NCERT चे पुस्तक चौथ्यांदा बदल करण्यात आले आहेत. एप्रिलमध्ये एनसीईआरटीने म्हटले होते की, राजकारणातील अलीकडील घडामोडींच्या आधारे अध्यायांमध्ये बदल केले जातात आणि नवीन गोष्टींचा समावेश केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT