नवी दिल्ली : कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच
नवी दिल्ली : कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच sakal
देश

नवी दिल्ली : कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी प्रगतिशील धोरणे व त्यांच्या हिताचे कायदे आणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे कणखर नेतृत्व आहे, अशा शब्दांत भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्ष नेत्यांसमोर तीन वादग्रस्त कृषी कायद्यांचे समर्थन केले.

कोरोना संसर्गाच्या भीषण संकटात मोदी यांनी धाडसी निर्णय घेतले व स्वतः आघाडीवर राहून नेतृत्व केले. त्यामुळेच या संकटातून देशाची अर्थव्यवस्था तुलनेने वेगाने सावरली, अशीही भावना नड्डा यांनी मांडली. १०० कोटी लसीकरण, ८० कोटी गरीबांना मोफत अन्नधान्य याबद्दलही नड्डा यांनी मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा केली.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नवी दिल्ली पालिका परिषद सभागृहात झाली. पंतप्रधानांच्या हस्ते आज सकाळी परिषदेचे उद्‍घाटन झाले. गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, राज्यसभेचे सभागृह नेते पियुष गोयल, ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आदी उपस्थित होते. कोरोनाच्या तडाख्याने दीड वर्षांनी ही बैठक होत आहे.

कोरोना नियमांमुळे दिल्लीत कार्यकारिणीच्या ३४२ पैकी फक्त १२४ सदस्य प्रत्यक्ष सहभागी झाले असून बाकी सदस्य दूरभाष प्रणालीतर्फे सहभागी झाले आहेत. यात पक्षाचे मार्गदर्शक लालकृष्ण अडवानी व मुरली मनोहर जोशी यांचाही समावेश आहे. यंदा भाजपने पंतप्रधानांसह साऱ्या सहभागी सदस्यांची डिजिटल नोंदणी करण्याचे अभिनव पाऊल उचलले असे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. त्यांनी नड्डा यांच्या भाषणाची माहिती पत्रकारांना दिली.

नड्डा म्हणाले, ‘‘मोदी सरकार २०१४ मध्ये आले तेव्हा अर्थसंकल्पात शेतीसाठी केवळ २३ हजार कोटींची तरतूद होत असे. मागील वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठीची तरतूद एक लाख २३ हजार कोटींपर्यंत वाढविण्यात आली. तिळासह विविध तेलबियांचे क्षेत्र वाढले आहे.’’

शेतकऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय मोदी सरकारने घेतले यात सॉईल हेल्थ कार्ड, विक्रमी हमीभाव देणे, शेतकऱ्यांना थेट पैसे देणारी पंतप्रधान किसान सन्मान योजना यांचेही कार्यकारिणीत ज्या रीतीने कौतुक करण्यात आले ते पाहता कायदे मागे घेण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्य होणे अशक्य असल्याचे पुन्हा दिसले. मात्र चर्चेसाठी सरकार कधीही तयार आहे असे सीतारामन यांनी नमूद केले.

विधानसभा निवडणुका लक्ष्य

पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकांचा प्रचार व तयारीवर या कार्यकारिणीत विशेष चर्चा होणार आहे. त्यामुळेच योगी आदित्यनाथ यांना राजकीय ठरावांवेळी प्रमुख वक्ते म्हणून स्थान देण्यात आले. अलीकडे झालेल्या पोटनिवडणुकांत आसाम वगळता भाजपला इतरत्र जोरदार पराभव स्वीकारावा लागला. मात्र या निवडणुकांत पक्षाचा मताधार लक्षणीय वाढला अशा शब्दांत जे. पी. नड्डा यांनी पक्षनेत्यांना प्रोत्साहन दिले. तेलंगणात विजयाचे वातावरण असले तरी केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडीशा या राज्यांतील भाजप संघटना आणखी मजबूत करावी लागेल असेही नड्डा यांनी बजावले. देशातील १० लाख ४० हजार मतदान केंद्रांवर २५ डिसेंबरपर्यंत बूथ तेथे पक्षाची समिती, ही योजना संपूर्ण होईल असेही नड्डा म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT