Rahul Gandhi, Nitish kumar
Rahul Gandhi, Nitish kumar 
देश

स्वार्थी नितीश कुमार यांनी दगा दिला- राहुल गांधी 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : "नितीश कुमार यांनी आम्हाला दगा दिला आहे. ते भाजपसोबत काहीतरी डावपेच आखत आहेत याची आम्हाला कल्पना आली होती," अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नितीश यांच्यावर टीका केली. 

काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यासोबत मागील 20 महिन्यांपासून असणाऱ्या महाआघाडीला सोडचिट्ठी देत नितीश कुमार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. नितीश यांनी पाटणामध्ये सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमानंतर राजधानी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी नितीश यांच्यावर जोरदार टीका केली. या घडामोडींवर राहुल यांनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली. 

राहुल यांनी सांगितले की, "नितीश कुमार काही दिवसांपूर्वीच मला भेटले होते, परंतु त्यांनी काहीही स्पष्ट केले नाही. बिहारच्या जनतेने जातीयवादाविरोधात लढण्यासाठी नितीश यांच्या बाजूने कौल दिला होता. मात्र, आता नितीश यांनी स्वतःच्या राजकीय लाभासाठी जातीयवाद्यांशीच हातमिळवणी केली. हीच आपल्या देशातील राजकारणातील मेख आहे."

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT