Bihar Political Latest News
Bihar Political Latest News Bihar Political Latest News
देश

Bihar : नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

Bihar Political Latest News पाटणा : नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा (Resignation) दिल्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘असे करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल. आम्ही २०२०च्या विधानसभा निवडणुका एनडीएअंतर्गत एकत्र लढल्या होत्या. जनादेश जेडीयू आणि भाजपसोबत (BJP) होता. आम्ही जास्त जागा जिंकल्यानंतरही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले. आज जे काही झाले ते बिहारच्या जनतेशी व भाजपशी विश्वासघात आहे, असे पत्रकार परिषदेत बिहार भाजपचे प्रमुख संजय जयस्वाल म्हणाले.

मंगळवारी (ता. ९) सकाळी जेडीयू आमदार आणि खासदारांच्या बैठकीनंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपसोबतची युती तोडण्याची घोषणा केली होती. यानंतर नितीश कुमार यांनी दुपारी चार वाजताच्या सुमारास राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा (Resignation) सुपूर्द केला. नितीश कुमार राजभवनात पोहोचले तेव्हा समर्थकांचा मोठा जमाव ‘जिंदाबाद’च्या घोषणा देत होता.

जेडीयू विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नितीश कुमार यांनी भाजपवर अपमानित केल्याचा आरोप केला. त्याचवेळी त्यांनी त्यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप केला. नंतर नितीश कुमार हे तेजस्वी यादव यांना भेटण्यासाठी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी रवाना झाले. भाजपशी (BJP) युती तोडल्यानंतर नितीश कुमार आता आरजेडी, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करतील, अशी शक्यता आहे.

२०२० च्या बिहार (Bihar) विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयूने २४३ जागांपैकी ४५ जागा जिंकल्या. तर भाजपला ७७ जागा मिळाल्या होत्या. जेडीयूने कमी जागा जिंकूनही भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवून राज्याची कमान त्यांच्याकडे सोपवली होती. बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने ७९ जागा आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने १९ जागा जिंकल्या. तर हमला ४ जागा मिळाल्या. बहुमताचा आकडा १२२ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT