corona vaccine sakal media
देश

देशात सध्यातरी बुस्टर डोसची आवश्यक नाही - ICMR

संपूर्ण लसीकरण हीच सध्या प्राथमिकता

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहिम सध्या वेगाने सुरु असली तरी सहा महिन्यांपूर्वी लस घेतलेल्यांमध्ये या लसीचा प्रभाव कमी झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता तिसऱ्या अर्थात बुस्टर डोसची गरज असल्याच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत. मात्र, आयसीएमआरनं यावर स्पष्टीकरण देताना सध्यातरी बुस्टर डोसची आवश्यकता नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

आयसीएमआरचे वरिष्ठ संशोधक समीरन पांडा म्हणाले, "सध्या दोन डोस घेतलेल्यांमध्ये ८० टक्के लसीकरण हे आपलं महत्वाचं प्राधान्य आहे. सध्यातरी देशांतर्गत वैज्ञानिक अभ्यास बुस्टर डोसची आवश्यकता असल्याचं आधोरेखित करत नाहीत. सध्यातरी सार्वजनिक लसीकरण हा आपला प्राधान्याचा कार्यक्रम आहे.

दरम्यान, भारतात बुस्टर देण्याबाबत चर्चा झडत असताना विविध वैज्ञानिकांनी देखील देशात कमीत कमी अशतः लसीकरण व्हायला हवं. इम्युनॉलॉजिस्ट विनीता बाळ म्हणाल्या, "जेव्हा अनेक लोकांना पहिला डोस मिळणं अद्याप बाकी आहे, तरी भारताने या टप्प्यावर बूस्टर डोस देण्याचा विचार केला पाहिजे. असुरक्षित लोक तसेच ज्यांना गंभीर आजार आहेत, अशा रुग्णांना अतिरिक्त लसीचा डोस अर्थात बुस्टर डोससाठी विचार केला जाऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सप्टेंबर महिन्यात आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव म्हणाले होते की, "सध्याच्या घडीला बुस्टर डोस हा आपला मध्यवर्ती विचार नाही. लोकांना दोन डोस देणं हे आपलं महत्वाचं प्राधान्य आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT