rahul gandhi and narendra modi sakal media
देश

'आता मोदी सरकारने 'हे' देखील मान्य करावं' : राहुल गांधी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांनी काल देशाला संबोधित करताना तीन कृषी कायदे रद्द (Farm laws) करत असल्याची घोषणा केली. मागच्या वर्षभरापासून या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर (Singhu border) शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmer protest) सुरु होतं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज या निर्णयानंतर शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी सरकारला एका मोठ्या मुद्यावर झुकवल्यानंतर आता राहुल गांधी यांनी आणखी एक मागणी ट्विटरवरुन करुन सरकारला खोचक टोला लगावला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटलंय की, आता चीनने भारतात गाव वसवल्याचं सत्य देखील सरकारने मान्य करायला हवं. भारत आणि चीन यांच्यात लडाख सीमेवर वाद सुरु आहे. दरम्यान, आता अरुणाचलमध्ये चीनने एक गावचं वसवल्याची धक्कादायक माहिती गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या गावात जवळपास 101 घरं असून 1 नोव्हेंबर 2020 रोजी हे फोटो काढण्यात आले आहेत. भारताच्या प्रत्यक्ष सीमारेषेपासून तब्बल 4.5 किलोमीटर अंतर आत हे गाव आहे. अरुणाचल प्रदेशमधील सुबनशिरी जिल्ह्यातील त्सारी चू नदीच्या काठावर आहे. या भागावरून दोन्ही देशांमध्ये बराच काळ वाद सुरू आहे. हे ठिकाण सशस्त्र युद्धाची जागा म्हणून मार्क केलं आहे. हिमालायच्या पूर्वेकडील रांगेत असलेलं हो गाव दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या काळातच वसवण्यात आलं आहे, असा दावा विरोधकांचा आहे. त्यावरुनच आता हे सत्य देखील मोदी सरकारने मान्य करावं, अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.

कृषी कायदे रद्द केल्यानंतर काय म्हणाले राहुल गांधी?

"देशाच्या शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहासमोर अहंकारला झुकवलं आहे. अन्यायाच्या विरोधात झालेल्या या विजयाच्या शुभेच्छा! जय हिंद, जय हिंद का किसान" असं म्हणत राहूल गांधी यांनी या निर्णयाबद्दल माहिती दिली. राहुल गांधी यांनी आपला एक जुना व्हीडिओ शेअर करत या भावना मांडल्या आहेत. या व्हीडिओमध्ये राहुल गांधी म्हणताय की, "माझे शब्द लक्षात ठेवा की सरकारला हा कायदा मागे घ्यावा लागेल." त्यामुळे आता त्यांनी हा कायदा मागे घेतल्यानंतर राहुल गांधींकडून या शेतकऱ्यांचं अभिनंदन करण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT