raosaheb danve Sakal
देश

‘ओबीसीं’ची नाराजी आघाडीला भोवणार; रावसाहेब दानवे यांची स्पष्टोक्ती

‘इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण शून्य होण्यास राज्य सरकार जबाबदार आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात इम्पिरिकल डेटा सादर केला नाही म्हणून आरक्षण गेले.

संतोष शाळिग्राम

नवी दिल्ली - ‘इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण शून्य होण्यास राज्य सरकार जबाबदार आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात इम्पिरिकल डेटा सादर केला नाही म्हणून आरक्षण गेले. आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसींची नाराजी महाविकास आघाडीला भोवणार आहे,’’ अशी टीका रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.

दानवे यांच्याबरोबर दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी ‘सकाळ’ने संवाद साधला. महाराष्ट्रातील राजकीय टीकांबाबत बोलताना त्यांनी हे भाष्य केले. ‘‘राज्यातील सरकार हे अमर, अकबर, अँथनीचे सरकार आहे. ते समान उद्दिष्ट ठेऊन एकत्र आले आहेत. त्यामुळे शरद पवार कितीही टोकदार बोलले, तरी सरकार पडणार नाही. त्यांचा उद्देश साध्य झाला की ते सरकार असे‌ पडेल की त्यांनाच कळणार नाही. पवारांची टीकाही सत्य आहे. आता त्यांना काँग्रेस परत बोलावत आहे. पण पवार त्या पडक्या घरात जाणार नाहीत,’’ असे ते म्हणाले.

ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. याबाबत ते म्हणाले, ‘‘राज्य सरकारने इम्पिरिकल डेटा न्यायालयात सादर केला नाही. त्यामुळे आरक्षण टिकले नाही. एका समाजाचे मोठे नुकसान या सरकारने केले आहे. आरक्षण टिकविण्यासाठी वकिलांची फौज न्यायालयात उभी करायला पाहिजे होती. पण ते या सगळ्याचे खापर केंद्रावर फोडत राहिले. आता हा धंदा त्यांनी बंद करावा. केवळ मोर्चे काढून आणि स्वत:ला ओबीसी नेता असल्याचे मिरविल्याने आरक्षण मिळणार नाही. ओबीसी समाजाची दिशाभूल करण्यापेक्षा सरकारने पुरावे सादर‌ करावेत. छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांनी केवळ समाजासमोर चमकू नये.’’

ओबीसी उमेदवार देणार

ओबीसींचे राजकीय आरक्षण आता नसले, तरी आगामी सर्व निवडणुकांमध्ये ज्या ज्या जागा ओबीसींसाठी आहेत, तिथे ओबीसी समाजातील उमेदवार देण्याचा भाजपने निर्णय घेतला आहे, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

देशमुखांची माहिती सरकारकडे

अनिल देशमुख कुठे हे राज्य सरकारला माहिती आहे. ते कुठे जाणार आहेत? ते सापडत नसतील, तर हे राज्य सरकारचे अपयश आहे. त्यांना सरकारने शोधावे, असेही रावसाहेब दावने म्हणाले.

ईडीचा गैरवापर नाही

ईडी, सीबीआयचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप केला जातोय, या प्रश्नावर दानवे यांना हा आरोप फेटाळला. ते म्हणाले, ‘‘अशोक देशमुख यांची चौकशी कुणी केली? छगन भुजबळ, सुरेश कलमाडी, लालू प्रसाद यादव या नेत्यांना जेलमध्ये कुणी पाठवले? भाजप सरकार त्यावेळी नव्हते. या संस्थांचा वापर हा काँग्रेसच्या काळापासूनच सुरू आहे. आम्ही त्याचा कधीही गैरवापर केलेला नाही. ज्यांची चौकशी सुरू आहे, त्यांच्यावर आरोपही गंभीर आहेत’’

ओबीसी आरक्षणावरून भाजपचे आज राज्यभर आंदोलन

मुंबई - ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भाजपतर्फे बुधवारी (ता.१५) राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे आणि भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी मंगळवारी दिली. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.

यावेळी कुटे व टिळेकर यांनी सांगितले की, गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भाजप नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले. मात्र, आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत हालचालीच केल्या नाहीत. इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT