one farmer from Haryana earns 50 lakhs in stubble management business
one farmer from Haryana earns 50 lakhs in stubble management business  
देश

शेतकऱ्याने समस्येत शोधली संधी; एका हंगामात कमावले 50 लाख

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : दिल्लीमधील वाढलेले हवेचे प्रदुषण हा देशात चर्चेचा विषया बनला आहे, दरम्यान पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी या हंगामात शेतातील तण जाळत असल्यामुळे दिल्लीत प्रदूषणाची पातळी वाढत असल्याचा दावा करण्यात येत आहे. देशभरात या प्रश्नावर चर्चा सुरु आहे. हरियाणातील शेतकऱ्याने मुळ प्रश्नावर घाव घालत शेततील तण जाळून टाकण्याच्या पध्दतीलाच फाटा दिला आहे.

पंजाब आणि हरियाणा या भागांमध्ये शेतकरी शेतात अतिरिक्त ठरलेलं तण जाळून टाकतात मात्यार याचा परिणाम हवेची गुणवत्ता खराब होते आणि प्रदुषणाची पातळी देखील वाढते. दरम्यान हरियाणातील कैथलमधील एका शेतकऱ्याने शेतात उरलेल्या या तणाचे मॅनेजमेंट करणे सुरु केले आणि या समस्येला उत्पन्नाचे साधन बनवले. या शेतकऱ्याने सांगितले की, त्यांनी या तब्बल 300 लोकांना रोजगार उपलब्ध करुन देत शेतातील या तणाचे व्यवस्थापन करण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. या व्यवस्थापन व्यवसायात काम करताना भात शेतीच्या यंदाच्या हंगामात त्याने तब्बल 50 लाख रुपयांची कमाई देखील केली आहे.

शेतकरी असलेल्या रामकुमार यांनी सांगीतले की, "मी बेलर्सच्या मदतीने भाताचे उरलेल्या तणसाचे बंडल्स बनवतो आणि त्यानंतर ते पेपर बनवणाऱ्या मिल्सना विकतो". दरम्यान या व्यवसायामुळे प्रदुषण नियंत्रणात तर राहतेच सोबतच शेतकऱ्यांना पैसे देखील मिळत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

High Temperature : कोलकातामध्ये पन्नास वर्षातल्या सर्वोच्च तापमानाची नोंद; हवामान खात्याने दिली माहिती

Latest Marathi News Live Update: शिवरायांचं 'ते' वाघनखं महाराष्ट्रात येणं लांबलं

Rinku Singh T20 WC 24 : मिठाई, फटाके अन् सेलिब्रेशन, रिंकूचा फोन आला अन्... वडिलांनी सांगितलं त्या दिवशी काय घडलं

Jitendra Awhad : गुजरातच्या भरभराटासाठी महाराष्ट्राचा गळा घोटला जातोय; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

SCROLL FOR NEXT