देश

वृक्षतोडीबद्दल केला चाळीस कोटींचा दंड; कोलकाता हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

विनायक होगाडे

कोलकाता : विविध कारणांसाठी वृक्षतोड होताना पहायला मिळते. मात्र, वृक्षतोडीमागे योग्या कारण नसेल मोठा भुर्दंड सोसावा लागू शकतो. याचंच एक मोठं उदाहारण कोलकाता उच्च न्यायालयाने घालून दिलं आहे. साचलेले पाणी काढायच्या नावाखाली ६३ वृक्ष तोडल्याप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने नुकताच ४० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सौमित्र कांती डे यांना हा दंड ठोठावण्यात आला आहे.

२०१७ मध्ये या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली होती. खासगी मालमत्तेच्या आवारात साचलेले पाणी काढून टाकण्याची कोलकता महापालिकेकडून नोटीस मिळाल्याने पाणी काढण्यासाठी झाडे तोडावी लागली, असा दावा डे यांनी केला होता. मात्र, पाणी काढून टाकण्याचा आणि वृक्षतोडीचा काहीही संबंध नव्हता, असा दावा पश्‍चिम बंगाल सरकारने केला होता. संबंधित जागेवर सप्ततारांकीत हॉटेल उभे करण्याचा डे यांचा विचार असल्याचा दावाही सरकारने केला होता.

त्यांनी केलेल्या या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे कायमस्वरुपी नुकसान झाल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने संबंधित व्यक्तीला १५ दिवसांत ४० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. इतकंच नव्हे तर ज्या ठिकाणी वृक्षतोड केली त्याचठिकाणी १०० झाडे लावण्याचा आदेश देखील दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : उल्हासनगरहून विजय मेळाव्यासाठी कार्यकर्ते रवाना

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT