Rahul Gandhi Team eSakal
देश

पेगासस हा भारतीय लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न होता - राहुल गांधी

"संसदेत आम्ही यावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करु. यावर चर्चा होऊ नये, अशीच भाजपाची इच्छा असेल"

दीनानाथ परब

नवी दिल्ली: पेगासस (Pegasus) पाळत प्रकरणी सुप्रीम कोर्टाने (supreme court) आज मोठा निर्णय घेतला. तीन सदस्यीय समिती स्थापन केली. "पेगाससच्या विषयात सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घालण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. संसेदत आम्ही पुन्हा हा मुद्दा उपस्थित करु. संसदेत आम्ही यावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करु. यावर चर्चा होऊ नये, अशीच भाजपाची (bjp) इच्छा असेल" असे काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) म्हणाले.

"पेगासस हा भारतीय लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न होता. आम्ही या विषयात लक्ष घालू हे सर्वोच्च न्यायालयाकडून उचलण्यात आलेले मोठे पाऊल आहे. यातून सत्य समोर येईल असा मला विश्वास आहे" असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.

"शेवटच्या संसदीय अधिवेशनात आम्ही पेगाससचा मुद्दा उपस्थित केला होता. आज सर्वोच्च न्यायालयाने यावर आपलं मत मांडलं आणि आम्ही जे म्हणत होतो, त्याला पाठिंबा दिला. आमचे तीन प्रश्न होते. पेगाससला कोणी परवानगी दिली? कोणाविरोधात त्याचा वापर झाला आणि दुसऱ्या देशाकडे आपल्या लोकांची माहिती आहे का?" असे राहुल गांधी म्हणाले.

"पेगाससचा मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान आणि भाजपाच्या मंत्र्यांविरोधात वापर झाला. पेगाससच्या वापरातून मिळणारा डाटा पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे जात होता? निवडणूक आयोगाची फोन टॅपिंग, विरोधी पक्षनेत्यांचा डाटा पंतप्रधानां मिळत होता? जर हे असं घडत असेल, तर हा गुन्हा आहे" असे राहुल गांधी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! तरुणाने ग्लासात फटाका पेटवला, तेवढ्यातच मोठा स्फोट झाला अन्...; नेमकं काय घडलं?

Air Pollution : तंबाखूपेक्षा जास्त मृत्यू वायू प्रदुषणामुळे! भारता रोज ५७०० लोक गमावायेत जीव, धक्कादायक अहवाल समोर...

Jalna News : अंबड-घनसावंगी तालुक्यातील 252 गावासाठी 139 पोलिस पाटील पदासाठी पात्र; 26 गावाना मिळाल्या पोलिस पाटील

दिवाळीत गोड खाण्यावर ठेवा नियंत्रण! शरिरावरील दुष्‍परिणाम टाळण्यासाठी आहारतज्‍ज्ञांचा सल्‍ला

Black Magic Incident : मंचर स्मशानभूमीत जादूटोण्याचा संशय; अंधश्रद्धेचे काळे सावट कायम

SCROLL FOR NEXT