piyush goyal 
देश

रेल्वेचं खासगीकरण होणार? पीयूष गोयल यांनी लोकसभेत दिलं अजब उत्तर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - केंद्र सरकार सध्या अनेक सरकारी कंपन्यांमध्ये खासगी गुंतवणुकीला प्राधान्य देत आहे. यावरून सातत्यानं विरोधी पक्ष टीका करत आहे. यात सरकार आता रेल्वेचंही खासगीकरण करेल असा आरोप विरोधकांनी केला. यावर मंगळवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत रेल्वेच्या खासगीकरणाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. रेल्वेचं खासगीकरण होणार की नाही यावर खुलासा करताना त्यांनी म्हटलं की, रस्तेसुद्धा सरकारने बनवले आहेत त्यावर खासगी गाड्या धावतातच ना? तेव्हा कोणी म्हणतं का की यावरून फक्त सरकारी गाड्याच गेल्या पाहिजेत. सोमवारी चर्चेवेळी काँग्रेसच्या जसबीर सिंह गिल, आययूएमएलच्या ई टी मोहम्मद बशीर यांच्यासह इतर काही सदस्यांनी रेल्वेच्या खासगीकरणाचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता.

पीयूष गोयल म्हणाले की, रेल्वेचं कधीही खासगीकरण करण्यात येणार नाही. रेल्वे नेहमीच भारत सरकारच्या अखत्यारित राहिल. मी विश्वास देतो की रेल्वे ही भारताची संपत्ती असून रेल्वेचं खासगीकरण होणार नाही. रेल्वेच्या प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, रेल्वेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी, यासाठी खासगी क्षेत्राची गुंतवणूक देशहितासाठी होईल. 

लेकसभेत 2021-22 च्या रेल्वे मंत्रालया अंतर्गत असलेल्या अनुदानाच्या मागणीच्या चर्चेला उत्तर देताना पीयूष गोयल यांनी सांगितलं की, दुर्दैवी गोष्ट अशी आहे की खासदारांकडून खासगीकरण आणि कार्पोरेटायझेशनचा आरोप केला जात आहे. पण रेल्वेचं असं काही होणार नाही. सरकार रस्तेबांधणीसुद्धा करते आणि त्यावर फक्त सरकारी गाड्यांनाच परवानगी द्यावी असं कोणी म्हणत नाही. रस्त्यावर सर्व प्रकारची वाहने चालतात म्हणूनच प्रगती होते आणि सर्वांना सुविधा मिळतात. रस्त्यांचं उदाहरण देत गोयल म्हणाले की, रेल्वेच्या बाबतीत असं होऊ नये का? प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळू नयेत का? मालवाहू रेल्वे चालाव्यात आणि यासाठी जर खासगी क्षेत्र सहभागी होत असेल तर यावर विचार का करू नये असे प्रश्नही त्यांनी विचारले. 

रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले की, गेल्या सात वर्षात रेल्वेमध्ये लिफ्ट, एस्केलेटर यांसह इतर सुविधांसाठी मोठं काम झालं आहे. जर आपल्याला रेल्वे अत्याधुनिक करायची असेल तर पैशांची गरज पडेल. अमृतसरसाठी 230 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह योजना तयार केली आहे. अशा 50 स्टेशन्सच्या मॉडेलचं ड़िझाईन तयार करण्यात आलं आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या सुशोभिकरण आणि आधुनिकीकरणासाठी व्यापक गुंतवणूक केली जात ओआहे. जर खासगी गुंतवणूक यात येईल तर देशाच्या आणि प्रवाशांच्या फायद्याचं आहे. खासगी क्षेत्रात ज्या सेवा दिल्या जातील त्या भारतीय नागरिकांना मिळतील. रोजगार उपलब्ध होतील आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT