Modi at prawasi bharatiy diwas 
देश

"दोन लशींसह मानवतेच्या सेवेसाठी सज्ज; अक्षय उर्जा निर्मितीच्या क्षेत्रात 'आत्मनिर्भर भारता'चीआघाडी"

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवासी भारतीय दिवस संमेलन 2021 च्या उद्घाटन सत्रात बोलत होते. आज प्रवासी भारतीय दिवसानिमित्त 16 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनात मोदींनी भारताच्या विविध आघाड्यांवर होत असलेल्या प्रगतीची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, आज आपण इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यातून एकमेकांशी जोडले गेले आहोत. मात्र आपलं मन नेहमीच 'माँ भारती'सोबत जोडलं गेलेलं आहे. गेल्या काही वर्षांत अनिवासी भारतीयांनी इतर देशांमध्ये जाऊन आपली स्वत:ची ओळख बनवून ती मजबूत केली आहे. 

त्यांनी कोरोनाशी भारताने जो लढा दिला, त्याबद्दलही उहापोह केला. भारताने हा लढा नेटाने दिला असल्याचं त्यांनी म्हटलं. पुढे ते म्हणाले की, भारताला आधी पीपीई किट्स, मास्क्स, व्हेंटिलेटर्स आणि टेस्टींग किट्स बाहेरहून मागवावे लागले मात्र आता भारत आत्मनिर्भर बनला आहे. सध्या भारत मानवतेची रक्षा करायला दोन स्वदेशी लशींसह सज्ज झाला आहे. 

नरेंद्र मोदी म्हणाले की, जेंव्हा भारत दहशतावादाविरोधात ठामपणे उभा राहिले तेंव्हा जगाला देखील या समस्येशी दोन हात करण्याचे धैर्य प्राप्त झाले. सध्या भारत भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. आता भारतातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लाखो-करोडो रुपयांची रक्कम थेट पोहोचवली जात आहे. 

देशातील गरिबांचा विकास करण्यासाठी जी मोहिम राबवली जात आहे, त्या मोहिमेवर जगभरात चर्चा केली जात आहे. आपण जगाला हे दाखवून दिलं आहे की, अक्षय उर्जा निर्मितीच्या क्षेत्रात एक विकसनशील देश देखील आघाडी घेऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : नागपुरात कळमेश्वर MIDC मध्ये एशियन केमिकल्सवर कृषी विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT