PM Narendra Modi  sakal
देश

पंतप्रधान मोदींनी केलं भारताच्या निवडणूक आयोगाचं कौतुक

सकाळ डिजिटल टीम

भारताच्या संविधानाने नागरिकांना असा अधिकार दिला आहे ज्यात देशाचं नशिब बदलण्याची क्षमता असल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

नवी दिल्ली - आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज नमो अॅपवरून देशभरातील भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाचं (Election Comission) कौतुकही केलं. मोदी कार्याकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले की, देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) सुरु होणारा सोहळासुद्धा २३ जानेवारीपासून सुरु केला आहे. आज राष्ट्रीय मतदार दिवस (National Voter day) आहे आणि देशातील सर्व मतदारांचे अभिनंदन करतो. सर्व नागरिकांना आवाहन आहे की, मतदानात सहभाग घ्या, ७५ टक्के मतदान व्हावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

भारताच्या संविधानाने नागरिकांना असा अधिकार दिला आहे ज्यात देशाचं नशिब बदलण्याची क्षमता आहे. प्रत्येक मताची इतकी ताकद आहे जी अनेक योजना सुरु करते, महत्त्वाचे निर्णय घ्यायला लावते. देशाच्या प्रत्येक मतदारासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. निवडणुकीच्या माध्यमातून देशाच्या जनतेनं सरकार बनवलं असल्याचंही मोदी म्हणाले.

भारताच्या निवडणूक आय़ोगाचं कौतुक करताना मोदी म्हणाले की, भारत त्या देशांपैकी एक आहे जिथं निवडणूक आयोग लोकांना नोटीस पाठवू शकतो. अधिकाऱ्यांची बदली करू शकतो. आपली निवडणूक प्रक्रियेनं इतर देशांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. आता तुम्ही कार्यकर्त्यांनी नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहन द्या असंही मोदी कार्यक्रमात म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT