narendra_modi 
देश

प्रत्येक गाव, जिल्हा, राज्य स्वावलंबी व्हावे; पंतप्रधान मोदींकडून आत्मनिर्भरतेचा मंत्र 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली -  ‘‘ कोरोनाच्या आपत्तीने आम्हाला हाच धडा शिकविला आहे की आता आम्हाला आत्मनिर्भर म्हणजेच स्वावलंबी व्हावे लागेल. प्रत्येक गाव, जिल्हा आणि राज्याला आत्मनिर्भर व्हावेच लागेल,’’ असा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला. निमित्त होते पंचायतराज दिनाचे. पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील निवडक सरपंचांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. “माझ्या स्वराज्याच्या कल्पनेचा आधार ग्रामस्वराज्य हाच आहे” या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या उद्गारांचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला. मोदींनी यावेळी ‘ई-ग्राम स्वराज पोर्टल’ आणि ‘अॅप’चे उद्घाटन केले. तसेच स्वामित्त्व योजनाही सुरु केली. यावेळी ग्रामविकास मंत्री नरेंद्र तोमर उपस्थित होते. 

बदललेल्या व्यवस्थेत गावांनी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी बाहेर पाहू नये हीच शिकवण कोरोना संकटकाळात मिळाली आहे, तिचा पुरेपूर वापर करून घ्यावा असे आवाहन पंतप्रधानांनी केले. ते म्हणाले की, ‘‘ कोरोनाने आम्हा सर्वांची काम करण्याची पद्धतच बदलली आहे. अनेक संकटे समोर ठेवणाऱ्या या संसर्गाने आम्हाला स्वावलंबी बनण्याचा धडाही शिकवला आहे. ग्रामपंचायती या लोकशाहीतील एकजूट शक्तीचे केंद्र आहेत.’’ 

आजच्या परिस्थितीत देशाला आत्मनिर्भर करणे आणि त्याचा प्रारंभ बिंदू गाव आणि गावांची सामूहिक शक्ती हाच असणार आहे असे सांगून मोदी म्हणाले की ‘‘ निःस्वार्थीपणे देशवासीयांचे पोट भरणारा आपला अन्नदाता म्हणजे शेतकरी हा सुखी असणे ही देशाची खरी गरज आहे. या लॉकडाउनच्याकाळातही शेतकरी आणि पशुपालकांनी देशाला खाद्यान्नपासून दूध, दही, फळे त्यांची जराही कमतरता जाणवू दिलेली नाही.’’ 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राजीव गांधी यांचा उल्लेख 
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रसिद्ध वक्तव्याच्या संदर्भाने पंतप्रधानांनी सांगितले की, ‘‘आधी दिल्लीतून पाठविलेला एक रुपया गावापर्यंत पोचताना त्याचे १५ पैसे व्हायचे. मात्र आता १०० पैसे थेट गावापर्यंत/ लाभार्थ्यांपर्यंत पोचत आहेत.’’ कोरोना हा एक विचित्र आजार आहे असे सांगून मोदी म्हणाले की, ‘‘ सरकार आणि जनता यांच्यात विश्वासाचा दृढ पूल बांधला जातो तेव्हाच अशा भयंकर महामारी विरुद्धची लढाई कोणताही देश जिंकू शकतो. या संकटकाळात भारताने आत्तापर्यंत हेच दाखवून दिलेले आहे. स्वतःवरचा आणि व्यवस्थेवरचा विश्वास यामुळेच ही लढाई आपण जिंकण्याच्या स्थितीत आहोत.’’ 

‘ॲप’चे बळ 
‘ई-ग्राम स्वराज’ या ॲपच्या माध्यमातून गावांच्या विकास योजनांना बळ मिळेल असे सांगून पंतप्रधान पुढे म्हणाले की, ‘‘ यामध्ये ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या निधीची संपूर्ण पारदर्शक माहिती असेल आणि त्याच्या खर्चाचेही तपशील उपलब्ध असतील. गावांमध्ये “दो गज की दूरी” ही शिकवण दिली जाते. याचा खरा अर्थ ‘दो गज देह की दूरी, असा आहे, असे मोदी यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT