narendra modi5
narendra modi5 
देश

"मोदींमध्ये शेतकऱ्यांशी आमने-सामने चर्चा करण्याची हिंमत नाही का?"

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शेतकऱ्यांना संबोधित केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे टाकल्याचे जाहीर केले. पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर विरोधी पक्ष काँग्रेसने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. त्यांचे आंदोलन सुरु आहे, पण मोदी त्यांचा सन्मान करत नाहीत. 

मध्य प्रदेश सोडा, नाहीतर जमिनीत गाडेन; मुख्यमंत्र्यांनी दिली धमकी?

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत आमने-सामने चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये हिंमत नाही. सरकार 18 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचं म्हणते. पण तुम्ही पाहिलं तर हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत. कारण 'मिडलमॅन' उपस्थित आहेत. 

पंतप्रधान मोदी म्हणतात कोणत्याही दलालाशिवाय पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. पण असं नाहीये, हजारो शेतकरी अजूनही वंचित आहेत. 50,000 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जातात आणि नंतर त्यांना नोटीस पाठवली जाते की, पैसे परत करा. तुम्हाला चुकून पैसे आले आहेत, असंही चौधरी म्हणाले आहेत. 

तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करता, मग लाखोंच्या संख्येने शेतकरी मोकळ्या आकाशाखाली का बसले आहेत. कायदे रद्द केल्याने आकाश फाटेल काय? 20 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तुम्ही इतके जिद्दी का आहात, असा सवाल अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान मोदींना विचारला आहे. 

बंदी घातलेले ऍप वापरणाऱ्यांना होतो दंड? सरकारने केलं स्पष्ट

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अटल बिहारी वाजपेयीजींच्या जयंत्तीनिमित्त पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत जवळपास 6 राज्यांतील 9 कोटी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी आज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 18 कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. यावेळी त्यांनी म्हटलंय की, पश्चिम बंगालमधील 70 लाखांहून अधिक शेतकरी हे या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीयेत. कारण बंगालमधील ममता सरकारच्या राजकारणामुळे हे शेतकरी वंचित राहिलेले आहेत, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT