narendra modi file photo
देश

कोरोना काळात सरकारकडून मोठी घोषणा; 80 कोटी लोकांना लाभ

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गंत कोट्यवधी लोकांना 5 किलो धान्य मोफतमध्ये दिले जाणार आहे. महामारीमुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गंत कोट्यवधी लोकांना 5 किलो धान्य मोफतमध्ये दिले जाणार आहे. महामारीमुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. शिवाय गरीब लोकांना याकाळात आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. त्यामुळे जवळपास 80 कोटी गरिबांना पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मे आणि जून महिन्यामध्ये मोफत धान्य वाटप केले जाणार आहे. 2020 मध्ये लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतरही गरिबांसाठी मोफत धान्याची योजना आणण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब कल्याण योजनेंतर्गत 80 कोटी लोकांना या योजनेचा लाभ होणार आहे. केंद्र सरकार या योजनेसाठी 26 हजार कोटी रुपयांचा भार उचलणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं की, देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अशा परिस्थितीत गरीब लोकांना अन्नधान्य पुरवणे महत्त्वाचे आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना 2020 ला जूनमध्ये पाच महिन्यांसाठी वाढवण्यात आली होती. देश लॉकडाऊननंतर अनलॉकमध्ये प्रवेश करताना पंतप्रधान मोदी यांनी ही योजना जाहीर केली होती. यासाठी जवळपास 90 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशात लॉकडाऊन जाहीर केला होता. या काळात मजूर लोकांचे प्रचंड हाल झाले. अनेकांना आपल्या गावाकडे स्थलांतर करावे लागले. अनेकांनी आपल्या घरी जाण्यासाठी 400 ते 500 किलोमीटर अंतर कोणत्याही सुविधेशिवाय पायी चालून पार केल्याचं पाहायला मिळालं. सर्व व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले. अशावेळी मदत म्हणून केंद्र सरकारकडून मोफत अन्नधान्य पुरवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT