देश

मोदी सरकारचं ठरलं; आता लक्ष्य व्याप्त काश्‍मीर

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : "पाकिस्तानव्याप्त काश्‍मीर हा कायदेशीरदृष्ट्या भारताचा अविभाज्य घटक आहे. त्यावर भारताचा अधिकृतपणे ताबा असेल, अशा दिवसाची आम्हाला प्रतीक्षा आहे,' अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सरकारचे यापुढील लक्ष्य व्याप्त काश्‍मीर असेल, असे आज स्पष्ट केले. तसेच, दहशतवादावर कारवाईनंतरच पाकिस्तानशी संबंध सुरळीत होतील, असेही त्यांनी सुनावले. 

सरकारच्या शंभर दिवसांच्या पूर्तीनिमित्त परराष्ट्र मंत्रालयाचा लेखाजोखा जयशंकर यांनी आज मांडला. परराष्ट्र सचिव विजय गोखले हेही या वेळी उपस्थित होते. या शंभर दिवसांत मंत्रालयाच्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती देताना जयशंकर यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण बळकट करण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले.

जागतिक मंचावर भारताचे म्हणणे पूर्वीपेक्षा आता अधिक गांभीर्याने ऐकले जात आहे, असे सांगताना "जी-20' देशांचे व्यासपीठ तसेच जागतिक पर्यावरण संमेलनाचे उदाहरण त्यांनी दिले. ते म्हणाले, की "शेजारी प्रथम' या धोरणानुसार भारताचे मार्गक्रमण सुरू आहे. यामध्ये परस्पर संबंध आणि व्यापारी संबंधांवर भर देण्यात आला आहे. 

याअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीव, श्रीलंका, भूतान यांसारख्या देशांचे दौरेही केले, असे सांगून जयशंकर यांनी सांगितले. तसेच पाकिस्तानचे नाव न घेता खडे बोल सुनावले. एक शेजारी देश वेगळ्याच प्रकारचे आव्हान आहे.

सीमेपलीकडील दहशतवादावर कारवाई होत नाही, तोपर्यंत त्या देशाशी संबंध सुरळीत होणार नसल्याची स्पष्टोक्ती जयशंकर यांनी केली. सीमेपलीकडून होणारा दहशतवाद तसेच जम्मू-काश्‍मीरचे 370 वे कलम रद्द करण्यावरील भारताची भूमिका प्रभावीपणे जागतिक समुदायासमोर मांडल्याचेही त्यांनी सांगितले. 

आफ्रिका खंडावर लक्ष 

राष्ट्रीय उद्दिष्ट यशस्वीपणे गाठण्यासाठी सरकारच्या देशांतर्गत धोरण आणि परराष्ट्र धोरणांमध्ये सर्वोत्तम ताळमेळ असल्याचाही दावा त्यांनी केला. अनिवासी भारतीयांकडे विशेष लक्ष देण्याच्या भूमिकेअंतर्गतच अमेरिकेत, भारतीय आणि अमेरिकी नागरिकांचे संमेलन होणार आहे. त्याचप्रमाणे मागील 100 दिवसांत भारताने आफ्रिका खंडावर लक्ष केंद्रित केले असून, 18 देशांमध्ये भारतीय वकिलाती सुरू केल्या जाणार असल्याचे जयशंकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT