नवी दिल्ली - रस्ता अपघातात जेव्हा एखाद्या कुटुंबातील कर्ता पुरूष किंवा अन्य कोणी जायबंदी होतो किंवा मृत्युमुखी पडतो, तेव्हा संपूर्ण कुटुंब मानसिक आजारांबरोबरच गरीबीच्या खाईत लोटले जाते व विशेषतः ग्रामीण भागात हे प्रमाण अपघातांच्या ७५ टक्के असल्याचे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालय तसेच जागतिक बॅंकेच्या संयुक्त सर्वेक्षणात म्हटले आहे. ग्रामीण भारतात अपघातांमुळे दारिद्य्र व उपासमारीचे प्रमाण गंभीररीत्या वाढल्याचेही हा अहवाल सांगतो. महाराष्ट्रासह चार राज्यांत हे सर्वेक्षण करण्यात आले.
देशात मागच्या वर्षी कोरोनापेक्षा जास्त म्हणजे दीड लाखांहून अधिक मृत्यू रस्ते अपघातांत झाल्याचे वास्तव जागतिक बॅंकेच्या अन्य अहवालातून नुकतेच समोर आले होते. ग्रामीण अर्थव्यवस्था हा देशाच्या आर्थिक परिस्थितीचा कणा असल्याने या व्यवस्थेवरच आघात करण्यास वाढते अपघात कारणीभूत असल्याचेही यात दिसले आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
‘ट्रॅफिक क्रॅश इंज्युरीज अँड डिसेबिलिटी : द बर्डन ऑन इंडियन सोसायटी’ नावाने जारी झालेल्या अहवालात अपघातांना वेळीच आवर घातला नाही तर अंतिमतः त्यातून ग्रामीण भारतासमोरील गरीबीची समस्या अक्राळविक्राळ रूप धारण करेल असा इशारा देण्यात आला आहे.
हे निष्कर्ष चिंताजनक असून राज्य सरकारांनी नवीन मोटार वाहन कायदा त्वरित लागू करण्याची आवश्यकता आहे असे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ‘‘अपघातात दरवर्षी किमान दीड लाख लोकांचा जीव जातो व हे रोखण्यासाठीच केंद्राने नवा कायदा केला आहे. तो राज्यांनी लागू करावा. अधिकाधिक कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचविणे हे केंद्र-राज्य संयुक्त प्रयत्नांनीच शक्य आहे,’’ असे ते म्हणाले.
अपघात रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे दिल्लीचे पोलिस सहआयुक्त आलोककुमार म्हणाले की वाहनचालकांनी नियम पाळून वाहने चालविली तर, अपघातांचे प्रमाण निम्म्याहून खाली येऊ शकते. या दृष्टीने जागरूकता यायला हवी.
अहवालातील काही ठळक मुद्दे
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.