rahul gandhi and prakash javdekar
rahul gandhi and prakash javdekar 
देश

"लशीवर विश्वास नसणाऱ्या राहुल गांधींनी उपदेश देऊ नये"

कार्तिक पुजारी

केंद्रीय मंत्री प्रकाश जावेडकर यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले. टूलकिट काँग्रेसचीच निर्मिती असल्याचं राहुल गांधींनी स्पष्ट केलंय.

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री प्रकाश जावेडकर यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले. टूलकिट काँग्रेसचीच निर्मिती असल्याचं राहुल गांधींनी स्पष्ट केलंय. कारण, ज्या प्रकारची भाषा आणि ज्या प्रकारचे तर्क तुम्ही वापरले, ज्या पद्धतीने तुम्ही भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ते तुमच्या रणनीतीचा हिस्सा आहे हे स्पष्ट होतंय, असं जावडेकर म्हणाले. दरम्यान, राहुल गांधी यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर कोरोना स्थिती हातळण्यावरुन टीका केली होती. याला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना तत्काळ पत्रकार परिषद देऊन उत्तर दिलंय. (prakash javdekar criticize rahul gandhi on corona virus comment pm modi)

लोकांनी काळजी करण्याचं कारण नाही. देशातील सर्व नागरिकांना 2021 च्या डिसेंबरपर्यंत लस मिळेल. राहुल गांधींनी तिसरी, चौथी, पाचवी लाट अशी भीती घालणं सोडून द्यावं. देशाचा लसीकरण कार्यक्रम एकदम रोबस्ट आहे. राहुल गांधींनी राजस्थानमध्ये जावं, तिथं दररोज बलात्कार होत आहेत. याच आठवड्यात एका अॅम्युलन्सचा वापर बलात्कारासाठी करण्यात आला. राजस्थानमध्ये कोरोनामुळे व्हॅटिलेटर अभावी मोठ्या प्रमाणात मृत्यू होताहेत. याकडे त्यांनी लक्ष द्यावं, असं जावडेकर म्हणाले.

राहुल गांधींना लशीवर विश्वास नव्हता. नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाजप खासदार रंजिता कोली यांच्यावर काँग्रेसच्या गुंडांनी हल्ला केला. सुदैवाना त्या बचावल्या, पण त्यांचा इरादा स्पष्ट होतोय. त्यांच्याविरोधात काँग्रेसमध्ये रोष होता, कारण त्या दररोज 10-15 कोविड हॉस्पिटलला भेट द्यायच्या. त्या लोकांची मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा व्यक्तीवर हल्ला करण्यात आला. राजस्थानची ही कायदा-व्यवस्था आहे. गुन्हेगारांना अजून पकडण्यात आलं नाही. त्यामुळे राहुल गांधींनी आम्हाला उपदेश देण्याऐवजी राजस्थान आणि त्यांच्या इतर राज्यांमध्ये पाहावं, असं ते म्हणाले.

दरम्यान, पहिल्या लाटेत काही समजलं नसेल जाऊ द्या, पण दुसऱ्या लाटेसाठी पंतप्रधान जबाबदार आहेत, पंतप्रधानांनी नौटंकी केली. लसीकरण झालं नाही तर, तिसरी, चौथी लाट येईल, कारण विषाणू म्युटंट होईल. ज्या प्रकारे काम करत आहात, ते बंद करा, कारण लाखो लोक मरत आहेत. मृत्यूदर चुकीचा आहे. सरकार खोटं पसरवत आहे. जनतेला सत्य सांगा. मी राजकारण करत नाहीये, हा देशाचा भविष्याचा प्रश्न आहे. आम्ही शत्रू नाही, आम्ही मार्ग दाखवतो आहोत, आमचं ऐकलं असतं तर लाखो लोक मेले नसते, असं राहुल गांधी म्हणाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT