नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा विधेयकाला ईशान्य भारतातून प्रचंड विरोध होत आहे. संसदेतही काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला असला तरी, दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झाले असून, त्याच्या वर अंतिम शिक्कामोर्तबही झाले आहे.
नागरिकत्व सुधारणा विधेयकाला सोमवारी लोकसभेची मंजुरी मिळाली त्यानंतर बुधवारी राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झालं. दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतरशिक्कामोर्तब करण्यासाठी विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले. त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केल्यानं आता विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधेयक म्हणजे, एक मैलाचा दगड असल्याचे सांगून विधेयकाचं स्वागत केलंय.
भारतसाठी आणि भारताच्या करुणा आणि बंधुभावाच्या भावनेसाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे. राज्यसभेत हे विधेयक मंजुरी झाल्यानं मी आनंदी आहे. विरोधकांनीही त्या विधेयकाच्या बाजूने मतदान केले. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. अनेकांच्या वर्षानुवर्षांच्या वेदनांवर यामुळं तोडगा निघणार आहे. राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने 125 तर, विरोधात 105 मते पडली. त्यामुळं बहुमत नसतानाही भाजपला हे विधेयक राज्यसभेत मंजूर करून घेता आलं.
आता काय होणार?
हेही वाचा : जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 13 डिसेंबर
हेही वाचा : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी करा पाच गोष्टींचे नियोजन
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.