Yashwant Sinha vs Eknath Shinde esakal
देश

सत्तेची भूक खूपच धोकादायक; महाराष्ट्राच्या राजकारणावर सिन्हांचं परखड भाष्य

'एक विचारधारा आहे, जी लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम करत आहे'

सकाळ डिजिटल टीम

'देशाला मूक राष्ट्रपतींची गरज नाही, तर आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडणाऱ्या राष्ट्रपतींची गरज आहे.'

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीनंतर एकनाथ संभाजी शिंदे (CM Eknath Sambhaji Shinde) यांनी गुरुवारी सायंकाळी राज्याचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली. यावर आता राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा (Presidential Candidate Yashwant Sinha) यांनी जोरदार निशाणा साधलाय.

यशवंत सिन्हा काल रायपूरमध्ये दाखल झाले होते. इथं त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचं (Maharashtra Politics) वर्णन 'सत्तेची धोकादायक भूक' असं केलंय. एवढंच नाही तर सिन्हांनी भारतीय जनता पक्षावरही (BJP) जोरदार हल्लाबोल केलाय. सिन्हा म्हणाले, 'आज देशभर अशांततेचं वातावरण निर्माण झालंय. एक विचारधारा आहे, जी लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम करत आहे आणि सरकार स्वतः त्याचा प्रचार करत आहे.'

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार सिन्हांनी रायपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. ते पुढं म्हणाले, महाराष्ट्रात काय झालं ते तुम्ही पाहिलं आहे. त्यामुळं आपल्या लोकशाहीचं महत्त्व वाढलं आहे का? असा सवाल त्यांनी केला. केंद्र सरकारवर (Central Government) टीका करताना सिन्हा म्हणाले, केंद्र सरकार एकात्मतेच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही, तर संघर्षाचं राजकारण करत आहे.

सिन्हा यांनी देशातील जातीय हिंसाचाराच्या अलीकडच्या घटनांवरही सविस्तर भाष्य केलंय. आज देशभर अशांततेचं वातावरण निर्माण झालंय. एक विचारधारा आहे, जी लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम करत आहे आणि सरकार स्वतः त्याचा प्रचार करताना दिसत आहे. राष्ट्रपतींना अधिकार आहे, ते सरकारला सल्ला देऊ शकतात. पण, ते पंतप्रधानांचे बाहुले आहेत, त्यामुळं ते काही करू शकत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

देशाला मूक राष्ट्रपतींची गरज नाही, तर आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडणाऱ्या राष्ट्रपतींची गरज आहे. राष्ट्रपती कार्यालय हे अत्यंत प्रतिष्ठेचं कार्यालय आहे. राष्ट्रपती पद हे सन्माननीय पद आहे. राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींची काही कर्तव्ये आहेत, ती पार पाडलीच पाहिजेत. आपण इतिहासात पाहिलं आहे की काही राष्ट्रपतींनी पदाचा आदर केला तर काहींनी मौन बाळगलं, असा घणाघातही त्यांनी केंद्रावर केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT