Presidential Election yashwant sinha against draupadi murmu bjp  sakal
देश

राष्ट्रपती निवडणूक : द्रौपदी मुर्मू विरुद्ध यशवंत सिन्हा दुरंगी लढत

तब्बल ७० जणांचे उमेदवारी अर्ज बाद

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आलेल्या तब्बल ७२ जणांच्या ८७ उमेदवारी अर्जांपैकी छाननीनंतर ७० जणांचे अर्ज बाद झाले आहेत. यामुळे अंतिम लढत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा या दोघांमध्येच होणार असल्याचे आज औपचारिकरीत्या स्पष्ट झाले. तब्बल १६ राज्यांमधून उमेदवारी अर्ज आले होते. त्यातील १४ अर्ज महाराष्ट्रातून आले होते.

अर्जांची आज छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी आणि राज्यसभेचे ‘सेक्रेटरी जनरल'' पी. सी. मोदी यांनी गुरुवारी ही घोषणा केली. देशाच्या सर्वोच्च पदासाठी होणाऱ्या या निवडणुकीत ३१८ इच्छुकांनी प्रत्यक्ष येऊन उमेदवारी अर्ज घेतले. तर ११ जणांनी टपालाद्वारे अर्ज मागितले होते. यातील आठ जणांनी टपालाद्वारे अर्ज राज्यसभा सचिवालयाकडे पाठविले. उमेदवारी अर्ज प्रत्यक्ष येऊन भरण्याचा निकष असल्याने हे आठही अर्ज आपोआप बाद झाले होते. तर, २८ जणांचे अर्ज मतदार यादीत नाव असल्याचे अधिकृत प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे बाद ठरले. याशिवाय प्रस्तावक आणि अनुमोदकांसह ५० जणांच्या सह्या नसणे, तसेच १५ हजार रुपये अनामत रक्कम न भरणे या सारख्या कारणांमुळे अर्ज बाद होण्याचे प्रमाण जास्त होते.

चार संचांत उमेदवारी अर्ज भरण्याची मुभा असल्याने अंतिमतः देशभरातून आलेल्या ७२ जणांच्या ८७ अर्जांची छाननी झाली. मुर्मू आणि सिन्हा यांचे प्रत्येकी चार संचांतील आठ वगळता उर्वरित सर्वांचे एकूण ७९ अर्ज बाद झाले. निवडणुकीसाठी आलेल्या ११५ अर्जांपैकी सर्वाधिक अर्ज राष्ट्रीय राजधानी दिल्लीतून होते. दिल्लीतून १९ इच्छुकांनी २३ अर्ज भरले. त्याखालोखाल उत्तर प्रदेशातील १६ जणांनी १८ अर्ज भरले. महाराष्ट्रातून ११ जणांनी १४ अर्ज भरले होते. तर तमिळनाडूमधून १० उमेदवारांनी ११ अर्ज दाखल केले. दहा महिलांच्या १४ अर्जांचाही यात समावेश होता. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये यावेळी उमेदवारी अर्जांची संख्या सर्वाधिक असून एकूण ६२ इच्छुकांनी १५ हजार रुपये अनामत रक्कम भरल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ९.३० लाख रुपये जमा झाले आहेत. परंतु, अर्ज बाद ठरल्यामुळे या उमेदवारांना अनामत रक्कम परत मिळणार आहे.

एकूण मतदार ४८०९

राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलैला होणार असून यात संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील खासदार आणि देशभरातील सर्व विधानसभांचे आमदार असे एकूण ४८०९ मतदार मतदान करतील. त्यात लोकसभेच्या ५४३, राज्यसभेच्या २३३ अशा एकूण ७७६ खासदारांचा समावेश आहे. दिल्ली आणि पुदुच्चेरी या विधानसभा असलेल्या केंद्रशासित प्रदेशांसह २८ राज्यांमधील ४०३३ आमदारांचा समावेश आहे. प्रत्येक खासदाराच्या एका मताचे ७०० याप्रमाणे एकूण मतमुल्य ५४३२०० एवढे आहे. राज्यांतील लोकसंख्येच्या प्रमाणाच्या आधारे आमदारांच्या मताचे मूल्य ठरविण्याच्या निकषानुसार सर्व ४०३३ आमदारांच्या मतांचे एकत्रित मूल्य ५४३२३१ एवढे आहेत. एकूण मतदारांच्या मतांचे मूल्य १०,८६,४३१ एवढे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shalinitai Patil Passes Away: माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं मुंबईत राहत्या घरी निधन

BMC Election: मुंबईतील भाजपचा 'हा' अभेद्य किल्ला ठाकरे बंधू जिंकणार का? मारवाडी, गुजराती आणि जैन मतदारांच्या हाती निर्णय

IND vs SA. 5th T20I: भारताने जिंकली मालिका! आधी हार्दिक-तिलकने चोपलं अन् मग चक्रवर्तीने फिरकीच्या जाळ्यात द. आफ्रिकेला अडकवलं

T20 World Cup साठी संघ निवडीच्या एक दिवस आधीच शुभमन गिल टीम इंडियातून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या, एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT