Priyanka Gandhi UP Team eSakal
देश

'मोदींनी स्वत:साठी 2 विमाने घेतली तेवढ्या किमतीत एअर इंडिया विकली'

वाराणसीमध्ये आयोजित 'किसान न्याय' सभेतून प्रियांका गांधींना भाजपवर निशाणा साधला.

सुधीर काकडे

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या घटनेनंतर अत्यंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते आहे. प्रियांका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये आज किसान न्याय सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा लखीमपूर प्रकरणावरून केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले आहे. राज्य सरकार आणि केंद्रीय राज्यमंत्री त्यांच्या मुलाला संरक्षण देतायेत, त्यामुळे पीडितांच्या कुटुंबांना उत्तर प्रदेशात न्याय मिळण्याची आशा राहिलेली नाही. आज या देशात फक्त दोन प्रकारचे लोक सुरक्षित आहेत, ते म्हणजे सत्तेत असलेले भाजप नेते आणि त्यांचे अब्जाधीश मित्र अशी खरमरीत टीकाही त्यांनी यावेळी केली.

'देशाच्या गृहराज्यमंत्र्याच्या मुलाने निघृणपणे आपल्या गाडीखाली ६ शेतकऱ्यांना चिरडलं, या घटनेतील सर्व पीडित परिवार म्हणतात की आम्हाला नुकसानभरपाई नको आम्हाला न्याय हवा आहे, मात्र या सरकारमध्ये आम्हाला न्याय देणारं कोणी दिसत नाही' असं वक्तव्य प्रियांका गांधी यांनी किसान न्याय सभेला संबोधित करताना केलं.

पंतप्रधान 'उत्तम प्रदेश' आणि आजादी का अमृत महोत्सवाचं काम पाहण्यासाठी लखनऊला आले, पण पीडित कुटुंबांचे सांत्वन करण्याासाठी लखीमपूर खेरीला जाऊ शकले नाहीत. शेतकरी वर्षभरापासून आंदोलन करतायेत, या दरम्यान 600 हून अधिक शेतकरी मरण पावले. ते विरोध करतायेत कारण त्यांना माहिती आहे की, त्यांचे उत्पन्न, जमीन आणि पिकं या सरकारच्या अब्जाधीश मित्रांना जातील असंही प्रियांका गांधींनी यावेळी सांगितलं.

पीएम मोदींनी आंदोलक शेतकऱ्यांना 'आंदोलनजीवी' आणि दहशतवादी म्हटलं. योगीजींनी त्यांना गुंड म्हटलं आणि त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अजय कुमार मिश्रा म्हणाले की, ते आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 मिनिटात सरळ करतील. एकूणच या सर्व गोष्टींचा उल्लेख करत प्रियांका गांधी यांनी भारतीय जनता पक्षाला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं.

मोदीजींनी गेल्या वर्षी 16,000 कोटी रुपयांमध्ये स्वतःसाठी दोन विमाने खरेदी केली. त्यांनी या देशाची संपूर्ण एअर इंडिया या अब्जाधीश मित्रांना फक्त 18,000 कोटी रुपयांना विकली अशी टीका देखील प्रियांका गांधींनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

G Ram Ji Bill: विरोधकांचा गोंधळ, घोषणाबाजी आणि कागदफाड... तरीही जी रामजी विधेयक लोकसभेत मंजूर; यात काय विशेष आहे?

Cameron Green: कॅमेरून ग्रीनच्या हाती TAX कापून किती रक्कम येणार? आधीच Welfare Fund मुळे ७.२० कोटी कापले जाणार...

Liam Livingstone ला १३ कोटी देण्याची खरच गरज होती का? काव्या मारनच्या निर्णयावर होतेय टीका, मोहम्मद शमीचं नाव ओढलं जातंय... कारण

Sangli Shaktipith : आधी इलेक्शन, मग नवे रेखांकन; शक्तिपीठ महामार्गावर सरकारची सावध पावले

Career Growth Astrology: मिथुन राशीसाठी 2026 ठरणार सुवर्णकाळ! गुरुच्या भ्रमणामुळे आयुष्यात लाभ अन् मोठी संधी

SCROLL FOR NEXT