देश

यूपीतील भैयांबाबतच्या 'त्या' विधानावर CM चन्नी आणि प्रियांकांचा खुलासा, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते चरणजितसिंग चन्नी यांनी उत्तरप्रदेश आणि बिहारींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. चंडीगड येथील सभेत बोलताना चन्नी यांनी उत्तरप्रदेश, बिहार आणि दिल्लीतील भय्यांना पंजाबमध्ये घुसू द्यायचे नाही, या मंडळींना येथे राज्य करू द्यायचे नाही त्यासाठी सर्व पंजाबी नागरिकांनी एकजूट होणे गरजेचे असल्याचं म्हटलं होतं. विशेष या म्हणजे या सभेला काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी या देखील उपस्थित होत्या, चन्नी (Charanjit Singh Channi) हे विधान करत असताना प्रियांका या व्यासपीठावर बसून हसत होत्या असा आरोप विरोधकांनी केला होता. काँग्रेसने उत्तरप्रदेश आणि बिहारमधील (UP Bihar) जनतेचा अवमान केला असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनीही या विधानाचं भांडवल केल्यानंतर आता यावर आता चन्नी आणि प्रियांका गांधी या दोघांकडूनही स्पष्टीकरणवजा खुलासा करण्यात आला आहे. (Punjab Assembly Election 2022)

मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी म्हटलंय की, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात येत आहे. आजपर्यंत पंजाबमध्ये आलेल्या सर्व स्थलांतरित कामगारांनी कष्ट करून विकासाच्या मार्गावर नेले आहे. आमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेमच आहे आणि ते कोणीही बदलू शकत नाही, असं त्यांनी म्हटलंय.

दुसरीकडे प्रियांका गांधी यांनीही याबाबत बोलताना म्हटलंय की, जे काही मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी म्हणाले ते असं होतं की, पंजाब हा फक्त पंजाबींद्वाराच चालवला जाईल. त्यांच्या विधानाचा गैरअर्थ काढला जात आहे. मला वाटत नाही की, यूपीवरुन कुणाला पंजाबमध्ये येऊन राज्य करायची इच्छा असेल.

दुसरीकडे त्यांनी असा गैर अर्थ काढणाऱ्या भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी म्हटलंय की, तुम्ही यूपीच्या शेतकऱ्यांचा अपमानच केला आहे. ज्या पद्धतीने तुमच्या मंत्र्यांकडून शेतकऱ्यांना चिरडण्यात आलं आहे त्यानंतर पंतप्रधान आताच निवडणुका जवळ आल्यावर यूपीला भेट देत आहेत. मात्र, जेंव्हा शेतकरी आंदोलन सुरु होते, तेंव्हा त्यांनी भेट दिली नाही. महागाई आणि बेरोजगारी सध्या टीपेला पोहोचली आहे.

भाजप आणि आम आदमी पक्ष हे दोन्ही पक्ष फक्त त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पंजाबमध्ये आले आहेत. चन्नीजींनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, पंजाबच्या लोकांसाठी एक मजबूत आणि स्थिर सरकार हवंय. मला पंजाबमध्ये काँग्रेसचीच लाट दिसून येतेय, असंही प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे.

PM मोदींनीही केली आहे टीका

'संत रविदास यांचा जन्म कुठे झाला? असा प्रश्न उपस्थित करत संत रविदास यांचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला होता आणि तुम्ही म्हणताय की, युपी बिहारच्या भैयांना येथे येऊ देऊ नका. अशा फुटीरतावादी मानसिकतेच्या लोकांना पंजाबवर क्षणभरही राज्य करू देऊ नका असे आवहन मोदी यांनी यावेळी उपस्थित जनतेला केले आहे. काँग्रेसने नेहमीच शेतकऱ्यांची फसवणूक केला असून, याला इतिहास साक्षीदार असल्याचा घाणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ज्यांनी तुम्हाला दिल्लीत प्रवेश करण्यास अडवले तेच लोक आता मतं मागण्यासाठी तुमच्याकडे येत आहे, परंतु, अशा लोकांना पंजाबमध्ये काही करण्याचा अधिकार आहे का? असा सवाल मोदींनी यावेळी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagarpalika Election Date: या तारखेला नगरपालिकेची झुंज! स्थानिक स्वराज्यच्या पहिल्या टप्प्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, Time Table बघा अन् लागा तयारीला...

Duplicate Voters List : दुबार मतदाराच्या नावापुढे डबल स्टार, नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आयोगाने उचलले मोठे पाऊल, कशी घेणार दक्षता ?

Latest Marathi News Live Update : 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत होणार 'या' अभिनेत्याची एंट्री; प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षकांनीच सांगितलं नाव

Ganesh Naik : १५०० बिबट वनतारामध्ये स्थलांतरित व १००० पिंजरे खरेदीसाठी १० कोटी रुपये निधी मंजूर करण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT