Rahul Gandhi  Esakal
देश

Rahul Gandhi: 'संसदेत घुसखोरी झाली तेव्हा भाजप खासदार पळून गेले', सुरक्षेतील त्रुटींवर राहुल गांधींनी दिली प्रतिक्रिया

इंडिया आघाडीच्या 143 खासदारांच्या निलंबनाच्या निर्णयाविरोधात जंतरमंतरवर विरोधी पक्षांनी निदर्शने केली. यावेळी राहुल गांधींनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

अंकिता खाणे (Ankita Khane)

इंडिया आघाडीच्या 143 खासदारांच्या निलंबनाच्या निर्णयाविरोधात जंतरमंतरवर विरोधी पक्षांनी निदर्शने केली. यावेळी राहुल गांधींनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी, व्हिडिओ शूटिंग या मुद्द्यांवरही राहुल यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. संसदेत घुसखोरी झाली की, भाजप खासदार पळून गेले, असंही ते यावेळी म्हणालेत.

संसदेच्या सुरक्षेबाबत राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केंद्र सरकारला अनेक प्रश्न केले आहेत. राहुल यांनी विचारले की, संसदेच्या सुरक्षेत कसली कसूर झाली, हे तरुण संसदेत कसे आले? संसदेच्या आत गॅस स्प्रे कसा आणला, जर ते गॅस स्प्रे आणू शकत असतील तर ते संसदेत काहीही आणू शकतात. राहुल म्हणाले, प्रश्न असा आहे की, या तरुणांनी संसदेत घुसखोरी का केली? ते म्हणाले, याचं कारण बेरोजगारी आहे. आज देशातील तरुणांना रोजगार मिळत नाही. देशात प्रचंड बेरोजगारी आहे.

ही द्वेष आणि प्रेम यांच्यातील लढाई

काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, आम्ही सर्व विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्षाचे कार्यकर्ते एकत्र उभे आहोत. ही लढाई द्वेष आणि प्रेम यांच्यातील लढाई आहे. द्वेषाच्या बाजारात आपण प्रेमाचे दुकान उघडतोय. तुम्ही जितका द्वेष पसरवाल... तितकी इंडिया आघाडी प्रेम पसरवेल.

तत्पूर्वी, लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी विरोधकांच्या निदर्शनास संबोधित करताना, मोदी सरकारचा अहंकार मोडून काढण्याची वेळ आली आहे. जर मोदी सरकारला वाटत असेल की, ते खासदारांचे निलंबन करून आम्हाला घाबरवू शकते किंवा झुकवू शकते, परंतु इंडिया आघाडी ना घाबरली आहे आणि न झुकली आहे, आम्ही लढायला तयार आहोत. कारण लढा आपल्या रक्तात, डीएनएमध्ये आणि इतिहासात आहे, असं ते म्हणाले आहेत.

त्याचवेळी काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला म्हणाले की, जर देशातील संसदेत लोकांना आवाज उठवू देत नसेल तर संसदेची गरजच काय? मोदी सरकार देशाच्या संविधानाचा गळा घोटत आहे. आज भारताची लोकशाही धोक्यात आहे. अशा परिस्थितीत इंडिया आघाडी गप्प बसणार नाही, आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत देशातील जनतेसाठी लढणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT