ramdas rahul 
देश

राहुल गांधींनी दलित मुलीशी करावं लग्न; 'हम दो, हमारे दो'वरुन रामदास आठवलेंचा सल्ला

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातील भाषणामध्ये मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. आपल्या भाषणात राहुल गांधींनी मोदी सरकारवर आसूड ओढताना म्हटलं होतं की, हे सरकार 'हम दो, हमारे दो'चं सरकार आहे. म्हणजेच मोदी-शहा यांचं अंबानी-अदानी यांच्यासाठीचं हे सरकार असल्याची घणाघाती टीका राहुल गांधींनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर आता केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी राहुल गांधींना एक सल्ला दिला आहे. 

त्यांनी म्हटलंय की, 'हम दो, हमारे दो' हे घोषवाक्य आधी कुंटुबनियोजनासाठी वापरलं  जायचं. जर राहुल गांधींना या घोषवाक्याचा प्रचार करायचा असेल तर सर्वांत आधी त्यांनी लग्न करायला हवं. त्यांनी दलित मुलीशीच लग्न करावं आणि जाती निर्मूलनाचं महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण करावं. हे लग्न युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल. पुढे बोलताना रामदास आठवले यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते शिबू सोरेन आणि हेमंत सोरेन यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील व्हावं, असंही म्हटलं. देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलं.

राहुल गांधी काय म्हणाले होते?
संसदेत 11 फेब्रुवारी रोजी भाषण करताना राहुल गांधी म्हणाले की, ‘एकेकाळी हम दो, हमारे दो ‘चा नारा दिला जायचा. मात्र आता 'हा देश फक्त चार जण चालवत आहेत. म्हणजेच 'हम दो, हमारे दो' हे सरकार चालवत आहेत. त्यांची नावं मी घेणार नाही. पण ते लोक कोण आहेत, हे सर्वांना माहिती आहे”, अशी टीका केली केंद्र सरकारवर केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT