ramdas rahul 
देश

राहुल गांधींनी दलित मुलीशी करावं लग्न; 'हम दो, हमारे दो'वरुन रामदास आठवलेंचा सल्ला

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातील भाषणामध्ये मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. आपल्या भाषणात राहुल गांधींनी मोदी सरकारवर आसूड ओढताना म्हटलं होतं की, हे सरकार 'हम दो, हमारे दो'चं सरकार आहे. म्हणजेच मोदी-शहा यांचं अंबानी-अदानी यांच्यासाठीचं हे सरकार असल्याची घणाघाती टीका राहुल गांधींनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर आता केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी राहुल गांधींना एक सल्ला दिला आहे. 

त्यांनी म्हटलंय की, 'हम दो, हमारे दो' हे घोषवाक्य आधी कुंटुबनियोजनासाठी वापरलं  जायचं. जर राहुल गांधींना या घोषवाक्याचा प्रचार करायचा असेल तर सर्वांत आधी त्यांनी लग्न करायला हवं. त्यांनी दलित मुलीशीच लग्न करावं आणि जाती निर्मूलनाचं महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण करावं. हे लग्न युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल. पुढे बोलताना रामदास आठवले यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते शिबू सोरेन आणि हेमंत सोरेन यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील व्हावं, असंही म्हटलं. देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलं.

राहुल गांधी काय म्हणाले होते?
संसदेत 11 फेब्रुवारी रोजी भाषण करताना राहुल गांधी म्हणाले की, ‘एकेकाळी हम दो, हमारे दो ‘चा नारा दिला जायचा. मात्र आता 'हा देश फक्त चार जण चालवत आहेत. म्हणजेच 'हम दो, हमारे दो' हे सरकार चालवत आहेत. त्यांची नावं मी घेणार नाही. पण ते लोक कोण आहेत, हे सर्वांना माहिती आहे”, अशी टीका केली केंद्र सरकारवर केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-पुणे फक्त दीड तासात, तर मुंबई-पुणे-बंगळुरू साडे पाच तासात; गडकरींनी सांगितला मास्टरप्लॅन

Petrol Diesel Price Today : पेट्रोल- डिझेलचे दर आज पुन्हा बदलले, तुमच्या शहरात काय आहे ताजा दर? जाणून घ्या एका क्लिकवर

IND vs SA 3rd T20I : गिल, सूर्यकुमारच्या फॉर्मकडे लक्ष; भारत-आफ्रिका यांच्यामध्ये आज तिसरा टी-२० सामना, कशी असेल Playing XI?

Kolhapur IT Park : अखेर कोल्हापूरला ‘आयटी पार्क’चा मार्ग मोकळा! जागा हस्तांतर निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब

ज्येष्ठ लेखक धनंजय चिंचोलीकर उर्फ बब्रूवान रुद्रकंठावार यांचं निधन, वयाच्या ६१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT