No Confidence Motion
No Confidence Motion 
देश

No Confidence Motion: मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली; राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे सभागृहात गोंधळ

Sandip Kapde

No Confidence Motion: खासदारकी बहाल झाल्यानंतर राहुल गांधी आज पहिल्यांदा लोकसभेत बोलले. अविश्वास प्रस्तावावर चर्चेचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी राहुल गांधी म्हणाले गेल्यावेळी अदानींचा मुद्दा जोरात मांडल्यामुळे भाजपच्या लोकांना त्रास झाला. आता त्यांना त्रास होणार नाही. मला पुन्हा खासदारकी बहाल केल्याबद्दल धन्यवाद.

यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रेतील अनुभव सांगितले. तसेच मोदी सरकारवर मणिपूर मुद्द्यांवर चौफेर टीका केली.

राहुल गांधी म्हणाले, "माझे भाषण आज अदानींवर नाही त्यामुळे भाजप नेत्यांनी काळजी करुन नये. जो शब्द दिलसे आते है ,वो दिल मे जाते है, आज दिमाग से नही दिलसे बोलुंगा. सत्ताधारी पक्ष शांत राहू शकतात. मी टोला मारणार नाही पण एक-दोन टोले नक्की लगावणार"

राहुल गांधी म्हणाले, "मी भारतात एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात प्रवास केला. समुद्र किनाऱ्यापासून काश्मीरपर्यंत मी प्रवास केला. मला अनेकांनी विचारले तुम्ही का चालत आहात? तर माझ्याकडे उत्तर नव्हते. कारण मलाच माहित नव्हते मी यात्रा का सुरू केली. मला नंतर कळाले मी ज्या गोष्टींवर मला प्रेम होते. ज्या गोष्टीसाठी मी मोदीजींच्या कारागृहात जायला तयार आहे. ती गोष्ट मला समजून घ्यायची होती. मला भारत समजून घ्यायचा होता.

"जशी मी यात्रा सुरू केली. मला वाटलं मी २५ किलोमीटर सहज चालू शकतो. हा माझा अहंकार होता. मात्र भारताने तो नष्ट केला. देश समजून घ्यायला मी यात्रा काढली. दोन दिवसात मला घुडग्याचा त्रास झाला. प्रत्येक पावलावर मला त्रास झाला. जो भारत पाहण्यासाठी मी अहंकारी रुपात निघालो होतो. तो नष्ट झाला. चालतांना मला त्रास झाला तेव्हा कोणतीतरी शक्ती मला पाठिंबा द्यायची. मला एका ८ वर्षाच्या मुलीने मला चिठ्ठी दिली. की मी तुमच्याबरोबर चालणार," असे राहुल गांधी म्हणाले.

"माझ्या जवळ एक शेतकरी आला. त्याच्या हातात कापूस होता. तो म्हणाला, राहुलजी हेच वाचले आहे. बाकी काही नाही. विम्याचे पैसे मिळाले का मी विचारले तर शेतकरी म्हणाले. भारतातील उद्योगपतींना पैसे गेले मला मिळाले नाही. त्याची भूक मला कळाली. यानंतर यात्रेचे स्वरुप बदलले", असे राहुल गांधी म्हणाले.

"लोक म्हणतात, हा देश आहे, ही जमीन आहे, कोण म्हणतात सोने आहे. मात्र देश एक आवाज आहे. देशातील लोकांचा त्रास हा देश आहे. देशातील लोकांचा आवाज समजून घ्यायचा असेल तर मनातील अहंकार मारावा लागेल. ही गोष्ट मी अविश्वास प्रस्तावादरम्यान का सांगितली?", असा प्रश्न सर्वांना पडला असेल."

"तर काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले नाहीत. कारण मोदींसाठी मणिपूर देश नाही. मणिपूरला यांनी तोडले आहे. दोन भाग केले आहेत. मणिपूरमध्ये मी रिलीफ कॅम्पमध्ये महिलांसोबत संवाद साधला.  मी त्यांना विचारले ताई काय झाले? त्या म्हणाल्या, माझा लहान मुलगा होता. माझ्या डोळ्यासमोर त्याला गोळी मारली. मी पूर्ण रात्र त्याच्या मृतदेहासोबत होती. त्यानंतर मला भिती वाटली मी माझे घर सोडले. फक्त मी माझे कपडे आणले. यावेळी तिने मुलाचा फोटो दाखवला. मणिपूरमध्ये मोदी सरकारने भारत मातेची हत्या केली. तुम्ही भारत मातेच्या रखवाले नाही तर हत्यारे आहात", असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस; महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळीनं झोडपलं

SCROLL FOR NEXT