Modi should protect country Rahul Gandhi criticism regarding China
Modi should protect country Rahul Gandhi criticism regarding China 
देश

लडाखमध्ये युक्रेनसारखी परिस्थिती; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

सकाळ डिजिटल टीम

राहुल गांधी सध्या लंडनमध्ये आहेत. त्यांनी तिथल्या एका कार्यक्रमात भारतातल्या केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. राहुल गांधींनी भारताची तुलना पाकिस्तानशी केली आहे. तसंच पंतप्रधान मोदी कोणाचंच ऐकत नाहीत, असंही ते म्हणाले आहेत. (Rahul Gandhi in London)

लंडनमध्ये आयोजित केलेल्या एका परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. आयडिया ऑफ इंडिया या कार्यक्रमात राहुल गांधींनी असंही म्हटलं आहे की, भारतात माध्यमं एक बाजू घेऊन काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाचंच ऐकत नाहीत. देशातली लोकशाही धोक्यात आहे, कारण संविधानिक मूल्यांवरती सातत्याने हल्ले होत आहेत.

पंतप्रधान मोदींसह भाजपावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, भाजपाने संपूर्ण देशात केरोसिन पसरवलंय. राज्यांची शक्ती कमी करण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. भारताचा आवाज एका विचारधारेने मारून टाकला आहे. आता ही एक राष्ट्रीय वैचारिक लढाई आहे.

भारत चीन संबंधांमध्ये असलेल्या तणावावरूनही राहुल गांधींनी टीका केली आहे. ते म्हणाले की, लडाखमध्ये युक्रेनसारखी परिस्थिती आहे. चीन सीमाभागात विकासकामं करतंय आणि पंतप्रधान मोदी चीनचं नावही घ्यायला तयार नाहीयेत. राहुल गांधींच्या याच वक्तव्यांमुळे भारताचा आणि जनतेचा अपमान केला असल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधींनी परदेशात जाऊन देशाला कमी लेखल्याचंही भाजपाने म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT