Rahul Gandhi  file Photo
देश

"खोटी आश्वासनं पाहिजे असतील तर मोदी, केजरीवालांना ऐका"

राहुल गांधींनी आज पंजाबच्या पटियालामध्ये प्रचारसभेला संबोधित केलं.

सुधीर काकडे

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections 2022) रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. पंजाबमध्ये (Punjab) 20 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस, आप आणि भाजपमध्ये मुख्य लढत असून, तिन्ही पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही (Rahul Gandhi) आज प्रचार मैदानात उतरले आहेत. आज पटियालामध्ये राहुल गांधींनी प्रचार सभेला संबोधित केलं. यावेळी त्यानी नरेंद्र मोदी (Narendra Modi), अरविंद केजरीवाल आणि सुखबीर सिंग बादल यांच्यावर निशाणा साधला.

राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना, सर्व नेते निवडणुकीच्या काळात खोटी आश्वासनं देत असल्याचं सांगितलं. त्यावर ते म्हणाले की, मी खोटी आश्वासनं देणार नाही. तुम्हाला खोटी आश्वासनं ऐकायची असतील तर मोदीजी, बादलजी आणि केजरीवालजींना ऐका. मला फक्त सत्य बोलायला शिकवलं गेलंय असं म्हणत राहुल गांधींनी एका दगडात तीन पक्षी मारले. काँग्रेस नेते राहुल गांधींनी पटियालातील राजपुरमध्ये जाहीर सभेला संबोधित केलं.

दरम्यान, पंजाबमध्ये २० फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी केली असून, या निवडणुकीत काँग्रेसला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शेतकरी आंदोलनमुळे पंजाबचा बहुतांश मतदार भाजपपासून दुरावल्याचं चित्र निर्माण झालं आहे. तर आम आदमी पक्ष देखील मोठ्या प्रमाणात तयारी करत असल्याचं दिसतंय. त्यामुळे पंजाबच्या विधानसभेवर कुणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT