Rajasthan Assembly Election Results 2023 eSakal
देश

Rajasthan Assembly Election Results 2023 : झालरापाटनमधून माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे विजयी; जाणून घ्या किती मतांनी मिळवला विजय

माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) तब्बल 103010 मतांनी विजयी झाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

2018 मध्ये त्यांनी तत्कालीन काँग्रेस नेते मानवेंद्र सिंह यांचा पराभव केला आणि 54 टक्के मतं मिळवली होती.

Rajasthan Assembly Election Results 2023 : झालरापाटन मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) तब्बल 103010 मतांनी विजयी झाल्या आहेत.

2003 पासून त्या या जागेवरून विजयी होत आहेत. 2018 मध्ये त्यांनी तत्कालीन काँग्रेस नेते मानवेंद्र सिंह यांचा पराभव केला आणि 54 टक्के मतं मिळवली होती. राजस्थान निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) सध्या 110 ते 115 जागांवर आघाडीवर आहे.

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी मतमोजणी केंद्रांवर सर्व व्यवस्था सुरळीत करण्यात आली आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून सर्व केंद्रांवर मतपत्रिकांची मोजणी सुरू झाली असून सकाळी 8.30 वाजल्यापासून ईव्हीएमद्वारे पडलेल्या मतांची मोजणी सुरू झाली आहे.

राज्यातील 200 पैकी 199 जागांसाठी 25 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. राज्यातील करणपूर मतदारसंघाची निवडणूक काँग्रेस उमेदवाराच्या निधनामुळं पुढं ढकलण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: फक्त 'या' कारणांमुळे सोन्याचे भाव कोसळले; आज काय आहे 24 कॅरेचा भाव?

Monsoon Kitchen Care: पावसाळ्यात स्वयंपाकघरातील दमटपणा कमी करायचाय? मग 'या' गोष्टी नक्की करा

Khadakwasla Dam: 1961 चा महापूर… पण खडकवासला धरण वाचलं कसं? अज्ञात इतिहास वाचा

Rain-Maharashtra Latest live news update: NDA कडून सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीचा अर्ज भरला

Asia Cup 2025 Explainer : श्रेयस अय्यरने आणखी काय करायला हवं? आगरकर म्हणाला, ना त्याची चूक, ना आमची...; मग दोष कुणाचा?

SCROLL FOR NEXT