bjp rajsthan congress election 
देश

भाजपची नाव बुडण्यापासून वाचवता येणार नाही; नेत्यांनी दिला घरचा आहेर

सकाळ डिजिटल टीम

जयपूर - राजस्थानमध्ये 20 जिल्ह्यातील 90 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये 48 जागा सत्ताधारी काँग्रेसनं तर 37 जागांवर भाजपनं बाजी मारली आहे. या निकालानंतर राजस्थानच्या भाजप नेत्यानं घरचा आहेर दिला आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे निकटवर्तीय असलेल्या भाजप नेत्यांच्या एका गटाने हाडौती इथं झालेल्या पराभवाला पक्षाच्या राज्य संघटनेला जबाबदार ठरवलं आहे. 

भाजप नेत्यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून वरिष्ठ नेत्यांना एक सावधानतेचा इशाराच दिला आहे. नेत्यांनी म्हटलं की, विशिष्ट व्यक्तींच्या तालावर नाचण्यामुळे भाजप बुडण्याच्या मार्गावर आहे. असंच सुरु राहिलं तर भाजपची नाव बुडण्यापासून कोणी वाचवू शकणार नाही. संयुक्त पत्र प्रसिद्ध करणाऱ्या नेत्यांमधे आमदार प्रताप सिंह सिंघवी, माजी आमदार बाबूलाल वर्मा, भवानी सिंह राजावत, प्रल्हाद गुंजल, विद्या शंकर नंदवाना आणि भाजप नेते किशन पाटीदार यांचा समावेश आहे.

काँग्रेसचा भाजपच्या गडाला सुरुंग
कोटा, बूंदी, बारां आणि झालावाड जिल्ह्यात झालेल्या नगर परिषद आणि नगर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला मोठा दणका दिला. यानंतर भाजपच्या प्रदेश नेत्यांनी म्हटलं की, पक्षाला राजेंच्या झालावाड जिल्ह्यात विजय मिळवू शकते. पण विशिष्ट व्यक्तींच्या इशाऱ्यावर प्रदेशात काहीच काम आणि जनाधार नसलेल्या नेत्यांना निवडणूक प्रभारी करण्यात आलं आहे. तिकीट वाटपात मनमानी कारभार केला गेला. त्यामुळेच अशी अवस्था झाली. नाहीतर राजस्थानमध्ये कोटा भाजपचा अभेद्य गढ आहे असं मानलं जात होतं. त्याच गडाला काँग्रेसनं सुरुंग लावला आहे. 

भाजप नेत्यांची चिंता
भाजपच्या नेत्यांनी चिंता व्यक्त करताना म्हटलं की, कोटाच्या उत्तर आणि दक्षिण दोन्ही नगर पालिकेत भाजपचा पराभव करून काँग्रेसनं विजयी पताका फडकावली. तर बूंदीमध्ये जिल्ह्याचा अध्यक्ष करू शकलो नाही असं त्यांनी म्हटलं. तर कोटा, बारां जिल्ह्यातील रामगंजमंडी, कैथून, सांगोद, बारां, मांगरोल, अंता यासह बूंदि, केवरायपाटन, कापरेन, लाखेरी, नैनवा, इंद्रगढमध्येही भाजपचा पराभव झाला. 

भाजपच्या अंतर्गत भांडणाचा काँग्रेसला फायदा
काँग्रेसच्या प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षांनी म्हटलं होतं की, भाजप त्यांच्या अंतर्गत भांडणात अडकून पडले आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे त्यांचं लक्ष नाही. आधीच्या निवडणुकीत भाजप 60 ठिकाणी सत्तेत होतं आता त्यांच्याकडे फक्त 37 जागा उरल्या आहेत. तर काँग्रेसनं मुसंडी मारत 48 ठिकाणी सत्ता मिळवली आहे. तसंच दोन नगर पालिकांमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्याने अध्यक्ष बनला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

सिरियलमध्ये आली देशभक्त नागिण! इस्रोच्या रॉकेटला केला सलाम, नेटकऱ्यांनी एकता कपूरला केलं ट्रोल

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT