Rajiv Gandhi And Atal Bihari Vajpayee esakal
देश

राजीव गांधींच्या मदतीमुळे वाजपेयींचा जीव वाचला, नेमकं काय घडलं होतं?

राजीव गांधी यांनी या मदतीबाबत इतरांना कधी सांगितले नाही.

सकाळ डिजिटल टीम

Rajiv Gandhi And Atal Bihari Vajpayee : काँग्रेस पक्षाच्या रणनीतीमुळे अटलबिहारी वाजपेयी निवडणुकीत पराभूत झाले. मात्र या पराभवाचा अटलबिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान राजीव गांधी यांच्या वैयक्तिक आयुष्यात कोणताही परिणाम झाला नाही. लोकसभा निवडणुकीनंतर अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त झाले.

त्यावर भारतात उपचार होणे शक्य नव्हते. डाॅक्टरांनी अमेरिकेत जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी वाजपेयी यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने ते अमेरिकेला जाऊ शकत नव्हते.(Rajiv Gandhi Help Atal Bihari Vajpayee During In His Illness)

कसे तरी पंतप्रधान राजीव गांधी यांनी याविषयी माहिती मिळाली. त्यांनी एके दिवसी अटलबिहारी वाजपेयी यांनी भेटण्यास पंतप्रधान कार्यालयात येण्याचे निमंत्रण दिले. वाजपेयी गेले. त्यांना राजीव गांधी म्हणाले, तुमच्या नेतृत्वाखाली भारताचे प्रतिनिधीमंडळ संयुक्त राष्ट्रसंघात पाठवले जाईल. तुमच्या अनुभवाचा फायदा सरकार घेऊ इच्छित आहे. अशा प्रकारे वाजपेयी हे अमेरिकेत गेले. तेथे त्यांना आपल्या आजारपणावर उपचारही करता येऊ शकले.

यामुळे त्यांचा जीव वाचू शकला. राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांनी या मदतीबाबत इतरांना कधी सांगितले नाही. सर्वांना वाटले की अटलबिहारी वाजपेयी सारखा मोठा नेता आपल्या गुणवत्ता आणि पात्रतेच्या जोरावर संयुक्त राष्ट्रसंघात पाठवले गेले आहे. ते भारताचे पहिले नेते होते ज्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करुन देशाची मान उंचावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT