rajyasabha deputy speaker
rajyasabha deputy speaker 
देश

गोंधळ घालणाऱ्या खासदारांमध्ये आत्मशुद्धीचा भाव जागा होईल; उपसभापती करणार एक दिवसाचा उपवास

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - राज्यसभेत कृषी विधेयकाच्या मंजुरीवेळ झालेल्या गोंधळात खासदारांनी केलेल्या गैरवर्तनामुळे दु:खी झालेले उपसभापती हरिवंश एक दिवसाचा उपवास करणार आहेत. रविवारी कृषी विधेयकावरून विरोधकांनी राज्यसभेत अभूतपूर्व असा गोंधळ केला. या गोंधळात खासदारांनी नियमावली पुस्तिका फाडली, उपसभापतींचा माईक तोडला. त्यानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी 8 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली. 

हरिवंश यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहलं आहे. त्यात म्हटलं की, 20 सप्टेंबरला जे काही झालं त्यामुळे मला खूप वाईट वाटलं. गेल्या दोन दिवसांपासून मानसिक त्रास होत आहे. रात्रभर झोपही लागली नाही. भगवान बुद्ध माझ्या जीवनाची प्रेरणा आहेत. बिहारच्या भूमीत आत्मज्ञानाचा शोध लागलेल्या बुध्दांनी आत्मदीपो भव: असं म्हटलं होतं. मला वाटतं की संसदेत माझ्याशी ज्या पद्धतीने खासदार वागले त्यामुळे मला एक दिवसाचा उपवास करायला हवा. माझ्या या कृतीने सदस्यांमध्ये आत्मशुद्धीचा भाव जागा होईल असी आशा आहे. 

हरिवंश यांनी खासदारांना चहा दिला या कृतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. मोदींनी ट्विटरवरून म्हटलं की, यातून हरिवंश यांची महानता दिसून येते. लोकशाहीसाठी यापेक्षा सुंदर असा संदेश असू शकत नाही. यासाठी त्यांचे खूप अभिनंदन.

दरम्यान, निलंबनाच्या कारवाईचा निषेध कऱण्यासाठी राज्यसभेचे आठही खासदार संसदेच्या आवारातच धरणे आंदोलनासाठी बसले आहेत. रात्रभर ते आंदोलनासाठी बसले होते. त्यांच्यासाठी उपसभापती हरिवंश हे चहासुद्धा घेऊन गेले होते. मात्र खासदरांना पाहुणचारासाठी बसलो नाही. घरी आलात तर स्वागत सध्या आम्ही शेतकऱ्यांसाठी बसलो आहे असं उत्तर देत चहा घेण्यास नकार दिला. 

देशभरातून कृषी विधेयकाला विरोध होत असताना राज्यसभेत रविवारी ते मांडण्यात आलं. तेव्हा बहुमत नसेलल्या एनडीएविरोधात विरोधक आक्रमक झाले. या गोंधळातच आवाजी मतदानाने विधेयक मंजुर केलं गेलं. राज्यसभेत झालेल्या गोंधळावेळी खासदारांकडून उपसभापतींच्या समोर असलेली नियमपुस्तिकासुद्धा फाडली. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी केली होती. गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर सभापती व्यंकय्या नायडू यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT