देश

गरीब- श्रीमंतांमधील दरी नोटाबंदीमुळे कमी होणार - राजनाथसिंह

पीटीआय

नवी दिल्ली - पाचशे व हजारच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे राजकीय आणि प्रशासकीय कामामध्ये प्रामाणिकपणा येऊन गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी होईल, असा विश्‍वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी व्यक्त केला.

ते म्हणाले, ""नोटाबंदीच्या निर्णयामुळे नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास थोडा काळच सहन करावा लागेल, कारण सरकार पूर्ण क्षमतेने स्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. भ्रष्टाचारी आणि दहशतवाद्यांचे आर्थिक स्रोत या निर्णयामुळे बंद होतील. यामुळे राजकीय आणि प्रशासकीय कामांमध्ये प्रामाणिकपणा वाढणार आहे. तसेच, गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी होण्यास मदत होईल. भ्रष्टाचार, काळा पैसा आणि दहशतवादाला आळा घालण्यासाठी सरकारने नोटाबंदी केली.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT