Rahul Gandhi and Hardeep Singh Puri  
देश

‘भारत जोडो’ यात्रेत भाजपशासित राज्यात इंधन भरा, पैसे वाचतील; BJPचा काँग्रेसला टोला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर भाजपकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर खोचक टीका केली आहे. पुरी यांनी काँग्रेस नेत्यांना भाजपशासित राज्यांत वाहनांमध्ये इंधन भरण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून पैसे वाचू शकतील. (Bharat Jodo news in Marathi)

पुरी म्हणाले की, यात्रेदरम्यान, 12 राज्यांमधून 3,500 किलोमीटरचा प्रवास काँग्रेसनेते करणार आहे. भाजपशासित राज्यांमधून पेट्रोल भरल्यास काँग्रेस नेते डिझेल वाहनांवर प्रतिवाहन 1,050-2,205 रुपये वाचवू शकतात.

आपल्या ट्विटमध्ये केंद्रीयमंत्री म्हणाले, "काँग्रेससाठी एक सल्ला आहे, ज्या राज्यांनी इंधनाच्या किंमती कमी करण्याकडे दुर्लक्ष केलं अशा राज्यांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी भाजपशासित राज्यांमध्ये इंधन भरून घ्या.

पुरी पुढं म्हणाले की, दिल्लीऐवजी हरियाणामध्ये इंधन भरून रुपये 3.07/लिटर, राजस्थानऐवजी यूपीमध्ये इंधन भरून 3.96/लिटर रुपये, तेलंगणाऐवजी महाराष्ट्रात इंधन भरून 3.55 रुपये/लिटर तसेच तामिळनाडू आणि केरळऐवजी कर्नाटकमध्ये इंधन भरून अनुक्रमे 6.35 रुपये/लिटर आणि रुपये 8.63/लिटर वाचवू शकता.

दरम्यान 12 राज्यांमध्ये, 3,500 किमी आणि 150 दिवसांच्या प्रवासात, काँग्रेस प्रति डिझेल वाहन 1,050 ते 2,205 रुपयांच्या दरम्यान बचत करू शकता. या सल्ल्याबद्दल काँग्रेस माझे आभार मानू शकते, असही केंद्रीय मंत्री पुरी यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT