RSS vs Uddhav Thackeray esakal
देश

'धर्मनिरपेक्षतेचा नारा देणारे काश्मिरी पंडितांच्या हत्येवर गप्प का?'

सकाळ डिजिटल टीम

काश्मिरी पंडितांच्या हत्येनंतर राग येणं साहजिक आहे; पण..

नवी दिल्ली : सरकारी कर्मचारी राहुल भट यांच्या हत्येमुळं काश्मिरी पंडित समाजात भीती, चिंतेचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) नेते इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी या प्रकरणानंतर राजकीय पक्षांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. इंद्रेश कुमार यांनी खोऱ्यातील जनतेला दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात काश्मिरी पंडितांना (Kashmiri Pandit) साथ देण्याचं आवाहन केलंय.

एएनआयच्या वृत्तानुसार आरएसएस नेते इंद्रेश कुमार पुढं म्हणाले, काश्मिरी पंडितांच्या हत्येनंतर राग येणं साहजिक आहे. पण, सगळ्यात जास्त राग राहुल गांधी, ममता, केजरीवाल आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांसारख्या धर्मनिरपेक्षतेचा नारा देणाऱ्या पक्षांच्या मौनाचा आहे. कदाचित काश्मिरी पंडित हे या देशाचे रहिवासी नाहीत आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारानं काही फरक पडत नाहीय, असं त्यांना वाटत असावं, अशी टीका त्यांनी केलीय.

इंद्रेश कुमार पुढं म्हणाले, केंद्र सरकारनं (Central Government) काश्मिरी पंडितांना खोऱ्यात परतण्यासाठी मदत करावी. मी खोऱ्यातील स्थानिक लोकांना आवाहन करतो की, त्यांनी पंडितांसह दहशतवादाविरोधात (Terrorist) आवाज उठवावा. जोपर्यंत काश्मीर दहशतवादमुक्त होत नाही, तोपर्यंत देशातील जनता आरामदायी जीवन जगणार नाही, असंही त्यांनी नमूद केलंय. दरम्यान, अतिरेक्यांनी गुरुवारी बडगाम जिल्ह्यात (Jammu and Kashmir) चडुरामध्ये सरकारी कार्यालयात घुसून काश्मीर पंडित राहुल भटची हत्या केली होती. महसूल विभागात लिपिक पदावर कार्यरत भट यांच्यावर अतिरेक्यांनी खूप जवळून गोळ्या झाडल्या. दुपारी सर्व कर्मचारी काम करत होते, त्यावेळी दोन अतिरेकी घुसले आणि राहुल यांच्या टेबलजवळ जाऊन हल्ला केला. अतिरेक्यांनी यादरम्यान पळ काढला. हल्ल्यात जखमी राहुल यांना श्रीनगरच्या एसएमएचएस रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र, यादरम्यान राहुल यांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT