हिजाबमुळे (HIjab) सध्या देशात वातावरण ढवळून निघालं आहे. कर्नाटकच्या (Karnataka) एका शाळेतून सुरु झालेल्या या वादाचे पडसाद संपूर्ण देशात उमटले आहेत. त्यानंतर आता यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रीया येत आहेत. नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या भाजप नेत्या आणि खासदार साध्वी प्रज्ञा (Sadhvi Pragya) यांनी पुन्हा एकदा एक वक्तव्य केलं आहे. (Sadhvi Pragya on Hijab Row)
साध्वी यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कुठेही हिजाब घालण्याची गरज नाही. जे लोक त्यांच्या घरात सुरक्षित नाहीत त्यांनी हिजाब घालणं आवश्यक आहे. बाहेर असताना, जिथे जिथे ‘हिंदू समाज’ आहे, तिथे त्यांना हिजाब घालण्याची गरज नाही, विशेषत: ज्या ठिकाणी ते अभ्यास करतात, तिथेही हिजाबची गरज नाही असं वक्तव्य साध्वी प्रज्ञा यांनी व्यक्त केलं आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयात हिजाब प्रकरणाबाबत सुनावणी झाली. यावेळी मुस्लिम विद्यार्थिनींच्या वकिलाने प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप केला. सरकार फक्त हिजाबचाच मुद्दा का काढततंय. ते म्हणाले की, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिंदू मुली बांगड्या घालतात, तर ख्रिश्चन मुली क्रॉस घालतात. तेव्हा शाळा महाविद्यालयांतून त्यांना बाहेर का पाठवलं जात नाही असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. सरकारी आदेशात इतर कोणत्याही धार्मिक प्रतिकांचा उल्लेख केला गेलेला नाही. मग फक्त हिजाबच का? हिजाब घालणाऱ्यांच्या धर्मामुळे तर नाही ना? मुस्लिम मुलींशी होणारा भेदभाव हा पूर्णपणे धर्मावर आधारित आहे असा आरोप त्यांनी युक्तीवादा दरम्यान केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.