Rahul Gandhi_Shashi Tharoor 
देश

...तर राहुल गांधींना लवकरात लवकर अध्यक्ष करा - शशी थरुर

येत्या काळात विविध निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षात बदलाची मागणी

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरुर यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या नेतृत्वात बदल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं की, पक्षाला नवीन नेतृत्वाची गरज आहे. जर राहुल गांधींना काँग्रेसचा अध्यक्ष बनवायचं असेल तर हे लवकर व्हायला हवं. काँग्रेसला पुन्हा सत्तेत यायचं असेल तर नेतृत्व बदल करणं गरजंच आहे.

थरुर यांनी नेतृत्वात बदलाची मागणी करण्याबरोबरच विद्यमान हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात कोणतंही भाष्य केलं नाही. त्यांनी म्हटलं की, सोनिया गांधी स्वतः हंगामी अध्यक्षपद सोडू इच्छित आहेत. त्यामुळे पक्षाला लवकरात लवकर पक्षाचा नवा नेता निश्चित करायला हवा.

थरुर यांचा काँग्रेसच्या त्या २३ असंतुष्ट नेत्यांमध्ये समावेश आहे, जे पक्षाच्या नव्या नेतृत्वाची मागणी करत आले आहेत. गेल्या वर्षी G-23 च्या नेत्यांनी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षामध्ये व्यापक बदलाची मागणी केली होती.

शनिवारी तिरुवअनंतपुरममध्ये पत्रकाराशी बोलताना थरुर म्हणाले, जर राहुल गांधी यांना काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळायचं असेल तर लवकरात लवकर त्यांच्याकडे ही जबाबदारी द्यायला हवी. जर काँग्रेसला परत सत्ता काबीज करायची असेल तर लवकरच पक्षाचं नेतृत्वबदल करुन निवडणुकांचा सामना करायला तयार रहावं लागेल. काँग्रेसच्या विविध शाखांची इच्छा आहे की, राहुल गांधींना पुन्हा एकदा पक्षाचा अध्यक्ष निवडायला हवं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT