Rahul Gandhi_Shashi Tharoor
Rahul Gandhi_Shashi Tharoor 
देश

...तर राहुल गांधींना लवकरात लवकर अध्यक्ष करा - शशी थरुर

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरुर यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या नेतृत्वात बदल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं की, पक्षाला नवीन नेतृत्वाची गरज आहे. जर राहुल गांधींना काँग्रेसचा अध्यक्ष बनवायचं असेल तर हे लवकर व्हायला हवं. काँग्रेसला पुन्हा सत्तेत यायचं असेल तर नेतृत्व बदल करणं गरजंच आहे.

थरुर यांनी नेतृत्वात बदलाची मागणी करण्याबरोबरच विद्यमान हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात कोणतंही भाष्य केलं नाही. त्यांनी म्हटलं की, सोनिया गांधी स्वतः हंगामी अध्यक्षपद सोडू इच्छित आहेत. त्यामुळे पक्षाला लवकरात लवकर पक्षाचा नवा नेता निश्चित करायला हवा.

थरुर यांचा काँग्रेसच्या त्या २३ असंतुष्ट नेत्यांमध्ये समावेश आहे, जे पक्षाच्या नव्या नेतृत्वाची मागणी करत आले आहेत. गेल्या वर्षी G-23 च्या नेत्यांनी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षामध्ये व्यापक बदलाची मागणी केली होती.

शनिवारी तिरुवअनंतपुरममध्ये पत्रकाराशी बोलताना थरुर म्हणाले, जर राहुल गांधी यांना काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळायचं असेल तर लवकरात लवकर त्यांच्याकडे ही जबाबदारी द्यायला हवी. जर काँग्रेसला परत सत्ता काबीज करायची असेल तर लवकरच पक्षाचं नेतृत्वबदल करुन निवडणुकांचा सामना करायला तयार रहावं लागेल. काँग्रेसच्या विविध शाखांची इच्छा आहे की, राहुल गांधींना पुन्हा एकदा पक्षाचा अध्यक्ष निवडायला हवं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Pub Policy: अपघातप्रकरणी उलटसुलट आरोप झाल्यानं पोलीस आयुक्तांची मोठी घोषणा! 'पब्ज'बाबत दोन दिवसांत आणणार नवीन धोरण

Maharashtra Board 12th Result 2024: प्रतीक्षा संपली ! HSC बारावीचा निकाल जाहीर, मार्क्स किती मिळाले ? एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Latest Marathi News Live Update: मुंबईतल्या संथ मतदानाच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

Mumbai Election: मतदानादिवशी ढिसाळ कारभार, सरकारकडून गंभीर दखल; मुख्यमंत्री शिंदेंकडून चौकशीचे आदेश

Kyrgyzstan Violence : किर्गिस्थान हिंसाचार! संभाजीनगर, धाराशिव, बीडचे ५०० विद्यार्थी अडकले; होणार ऑनलाईन परीक्षा

SCROLL FOR NEXT