देश

अमेठीशी नातं सांगणाऱ्या खासदारानं फक्त मौन पत्करलंय : स्मृती इराणी

सकाळ डिजिटल टीम

अमेठी : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमेठी लोकसभा मतदारसंघाशी कौटुंबिक नाते असल्याचा दावा करणाऱ्यांनी संसदेत या मतदारसंघाच्या समस्या कधीच मांडल्या नाहीत, अशी टीका त्यांनी केली आहे. ही टीका त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर त्यांचं नाव न घेताच केली आहे. विशेष म्हणजे याच मतदारसंघातून स्मृती इराणी यांनी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांचा पराभव केला होता. अमेठी हा गांधी कुटुंबीयांचा परंपरागत मतदारसंघ म्हणून ओळखला जातो.

अमेठीतील तिलोई परिसरातील बस स्थानकासह पाच कोटींच्या प्रकल्पांचे उद्‌घाटन इराणी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी, त्या बोलत होत्या. यावेळी स्मृती इराणी म्हणाल्या की, अमेठीला वर्षानुवर्षे विविध समस्या भेडसावत आहेत. मात्र, या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदाराने फक्त मौन पत्करलं आहे. अमेठीशी कौटुंबिक नातं असल्याचा दावा करणाऱ्यांनी संसदेत या मतदारसंघाच्या समस्या कधीही मांडल्या नाहीत. त्यामुळे, अमेठीवासियांना वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहावे लागले, असा आरोपही त्यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशात विकासकामे करण्याचा योगी आदित्यनाथ सरकारच्या दृष्टिकोनामुळे अवघ्या नऊ महिन्यांत अमेठीतील तिलोईतील बस स्थानक तयार झाल्याचा दावाही त्यांनी केला. तिलोईत वैद्यकीय महाविद्यालय उभारले जात असून कोरोनाचा सामना करण्यासाठी ऑक्सिजन प्रकल्प उभारल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagaradhyaksha Results 2025 : राज्यात भाजपा १ नंबरचा पक्ष, कोणत्या पक्षाचे किती उमेदवार विजयी? वाचा विभागनिहाय यादी...

IND vs PAK U19, Final: वैभव सूर्यवंशी - आयुष म्हात्रे पाकिस्तानी खेळाडूंना भिडले; विकेट्सनंतर घडली चकमक; Video Viral

Latur to Badlapur: लातूर ते मुंबई प्रवास फक्त ५.५ तासांत होणार! कोकण–मराठवाड्याला थेट जोडणारा हाय-स्पीड हायवे मंजूर, पाहा मार्ग

Devendra Fadnavis: नगरपरिषद निवडणुकांत भाजप नंबर वन! देवेंद्र फडणवीसांनी विजयाचं श्रेय कुणाला दिलं? म्हणाले...

हृदयद्रावक घटना! 'टिप्परच्या धडकेत पिता-पुत्राचा जागीच मृत्यू'; आजारी मुलाला शाळेतून आणताना गुरसाळेत काळाचा घाला..

SCROLL FOR NEXT