Bharat Jodo Yatra conclusion rahul gandhi congress Mallikarjun Kharge politics esakal
देश

Bharat Jodo : राहुल गांधींनी सांगितलं 'भारत जोडो' सुरू करण्याचं खरं कारण; म्हणाले आम्ही...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - कन्याकुमारी येथून सुरु झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Congress Bharat Jodo Yatra) सध्या हिमाचल प्रदेशात दाखल झालीये. हजारो लोक खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेत दाखल झाले आहेत. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेली ही यात्रा सुरू करण्याचे कारण आज राहुल गांधी यांनी सांगितलं. (Rahul Gandhi news in Marathi)

राहुल गांधी म्हणाले की, यात्रेपूर्वी आम्ही संसदेत मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. पण ते आम्हाला तिथे मुद्दे मांडू दिले नाहीत. भारतातील संस्था, मग ती न्यायव्यवस्था असो वा प्रेस, ते सर्व भाजप-आरएसएसच्या दबावाखाली आहेत. त्यामुळे आम्ही कन्याकुमारी येथून यात्रेला सुरुवात केली.

राहुल गांधी सातत्याने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करताना दिसत आहेत. राहुल यांच्या भारत जोडो यात्रेची मोठी चर्चा झाली आहे. लवकरच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेत राहुल यांनी अनेक राज्यातील संस्कृती समजून घेतली.

दरम्यान भारत जोडो यात्रेचा समारोप ३० जानेवारीला श्रीनगरमध्ये होणार आहे. त्यानंतरचा काँग्रेसचा प्लॅन ठरला आहे. राहुल गांधी यांचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी काँग्रेसने योजना आखली आहे. त्यासाठी काँग्रेस २६ जानेवारीपासून मोहीम राबवणार आहे. ही मोहिम २६ मार्चपर्यंत चालणार आहे. या नव्या योजनेअंतर्गत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी द्वेष, बेरोजगारी, महागाई आणि सर्वसामान्य जनतेशी संबंधित इतर प्रश्नांबाबत पत्र लिहिले आहे. हे पत्र बुथ पातळीपर्यंत पोहचवून नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT