Sonia Gandhi
Sonia Gandhi Team eSakal
देश

सोनिया गांधी अ‍ॅक्शन मोडमध्ये; पराभवानंतर घेतला मोठा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना राजीनामे देण्यास सांगितलं आहे. प्रदेश काँग्रेसची पुनर्रचना करण्याच्या हेतूनं त्यांनी हे राजीनामे देण्यास सांगितल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना सांगितलं आहे. तसंच आणखी काही महत्वाची पावलं देखील काँग्रेस (Congresss) उचलणार असल्याची माहिती मिळतेय.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल १० मार्चला जाहीर झाले. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपुर आणि उत्तराखंड या राज्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या सर्व निवडणूकांमध्ये काँग्रेसला (Congress) दारून पराभव स्विकारावा लागला आहे. एकूण पाच राज्यांत मिळून देखील काँग्रेसला शंभरी पार करता आलेली नाही. त्यानंतर पक्षाने काही मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. सोनिया गांधींनी पंजाबचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू, उत्तर प्रदेशचे अजय लल्लू, उत्तराखंडचे गणेश गोदियाल, गोव्याचे गिरीष चोडणकर आणि मनिपुरच्या एन. लोकेन सिंह यांना राजीनामे मागितले आहेत.

पंजाब वगळता इतर सर्व राज्यांत देखील काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. काँग्रेस पंजाबमध्ये १७, उत्तराखंडमध्ये २५, उत्तरप्रदेशमध्ये २, मणिपूर ९ तर गोव्यात १२ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे काँग्रेसला एकूण १०० जागा देखील मिळवता आलेल्या नाहीत. त्यानंतर आता पक्षश्रेष्ठींनी काही महत्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींचं PM पद ते बारामतीचा खासदार कोण? पुण्याच्या ज्योतिषाचं मनमोहन सिंग यांच्याबद्दलचही भाकीत ठरलं होतं खरं

Elon Musk EVM : इलॉन मस्क विरुद्ध भारतीय EVM; भाजपा नेत्यानं दिलं सडेतोड प्रत्युत्तर,जाणून घ्या काय आहे प्रकरण

T Raja Singh: "...तर यंदा भारत हिंदूराष्ट्र घोषित झाला असता," 400 पारच्या नाऱ्यावर काय म्हणाला भाजपचा कट्टर आमदार

Latest Marathi News Live Update : भोपाळमध्ये शिवराज सिंह चौहान यांचं जंगी स्वागत

Ganga River: अंत्यसंस्कारानंतर स्नानासाठी जाताना दुर्घटना! गंगा नदीत बोट उलटल्याने ५ जण बुडाले, माजी NHAI अधिकाऱ्याचाही समावेश

SCROLL FOR NEXT