SPG Protection For PM has a Budget Rs 600 Cr 
देश

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी वर्षाला होतात तब्बल एवढे कोटी रुपये खर्च

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात तब्बल ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच भारताच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेवर एका वर्षात तब्बल ६०० कोटी रुपयांचा खर्च केला जातो. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी खास पथक तयार करण्यात आलेले आहे. त्याला स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG)असे म्हणतात. या SPGसाठी यावर्षी अर्थसंकल्पात तब्बल ६०० कोटी रुपायांची तरतूद करण्यात आली आहे.

SPGमध्ये सध्या 300 कमांडोंचा समावेश आहे. त्यांना अतिशय कठीण असं प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी त्यांची निवड करण्यात येते. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी ५४० कोटींची तरतूद करण्यात आली होती. पंतप्रधानांचे देश विदेशातले दौरे, त्यांचं निवासस्थान, त्यांचे कुटुंबीय या सगळ्यांना असलेला धोका लक्षात घेऊन एसपीजीचं संरक्षण कव्हर पंतप्रधानांना दिले जाते.

जीएसटीबाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; जेटलींचीही आठवण

यापूर्वी माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही  एसपीजी संरक्षण दिलं जात होतं. मात्र काही महिन्यांपूर्वी एसपीजी कायद्यात दुरुस्ती करुन ते फक्त पंतप्रधानांसाठीच मर्यादित ठेवण्यात आले आहे. तत्पूर्वी, आपल्या देशात पंतप्रधान हे देशाचे सर्वोच्च कार्यकारी प्रमुख असतात. देशातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती पंतप्रधान असते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च सुरक्षा नियमांचं पालन केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

Tecno Pova Slim : सेम टू सेम आयफोन! चक्क 20 हजारात iPhone Air? नेमकी काय आहे ऑफर, पाहा एका क्लिकवर

Pune Traffic : सवलतीत दंड भरण्यास नागरिकांची झुंबड, फक्त ४००-५०० जणांनाच टोकन; तासन्‌तास रांगेत थांबलेल्यांची नाराजी

Latest Marathi News Updates: भारत -पाकिस्तान मॅचसाठी दीड लाख कोटींचं गॅम्बलिंग : संजय राऊत

ITI Admissions : ‘आयटीआय’चे ८३ टक्के प्रवेश पूर्ण; उर्वरित जागांवरील प्रवेशासाठी येत्या शनिवारपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT