Corona Vaccination 
देश

सर्व जनतेने घेतला पहिला डोस; 'या' राज्यांनी मिळवला पहिला मान

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतात सध्या कोरोनाचं संकट आहे. या संकटाशी सामना करण्यासाठी सध्या फक्त लसीकरण हे एकच शस्त्र उपलब्ध आहे. भारतात आपत्कालीन वापरासाठी म्हणून आतापर्यंत सहा लशींना मंजूरी मिळाली आहे. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन जॉन्सनच्या सिंगल डोस असलेल्या लसीला परवानगी दिली आहे. दरम्यान, भारतातील अनेक राज्यांनी तसेच केंद्र शासित प्रदेशांनी लसीकरणासाठी पात्र असलेल्या 100 टक्के लोकसंख्येला पहिला डोस देण्याचा पहिला मान मिळवला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

गोवा, हिमाचल प्रदेश, लडाख, सिक्कीम, लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव या सहा राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये लशीचा पहिला डोस १०० टक्के पात्र लोकसंख्येला देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश हे राज्य देशातील पहिलं असं राज्य ठरलं आहे, ज्याने आपल्या लसीकरणासाठी पात्र असलेल्या संपूर्ण लोकसंख्येला कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस दिला आहे.

यामध्ये दादरा, नगर हवेली आणि दमन-दीवमध्ये आतापर्यंत ६.२६ लाख डोस देण्यात आले आहेत. गोव्यामध्ये आतापर्यंत ११.८३ लाख डोस तर हिमाचल प्रदेशमध्ये ५५.७४ लाख डोस देण्यात आले आहेत. त्याखालोखाल लडाखमध्ये १.९७ लाख तर लक्षद्वीपमध्ये ५३,४९९ डोस देण्यात आले आहेत. तर सिक्कीममध्ये ५.१० लाख डोस देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर जागा दाखवली; जगात भारी कामगिरी केली Video Viral

DCM Sunetra Pawar : हजार शाळा ‘मॉडेल स्कूल’बनविणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

India China Strategy: चीनच्या तुलनेत भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढविण्याची गरज; ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये तज्ज्ञांचा सूर

Sangramdurg Ground Fort : ‘संग्रामदुर्ग’चा दोनशे वर्षांपूर्वीचा नकाशा पुरातत्त्व विभागाकडे मिळाला

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

SCROLL FOR NEXT