Ram Navami Violence esakal
देश

Ram Navami Violence : रामनवमी मिरवणुकीवर दगडफेक-गोळीबार; कलम 144 लागू, इंटरनेट सेवा बंद

हल्लेखोरांनी डझनभर वाहनं पेटवून दिली. काही वेळातच संपूर्ण परिसराचं वातावरण बिघडलं.

सकाळ डिजिटल टीम

काही ठिकाणी झालेल्या हिंसक संघर्षानंतर नालंदा डीएमनं संपूर्ण बिहारशरीफ शहरी भागात कलम 144 लागू केलं आहे.

Violence On Ram Navami In Bihar : बिहार शरीफमध्ये शुक्रवारी रामनवमी (Ram Navami) मिरवणुकीदरम्यान परिस्थिती आणखीनच बिघडली. शहरातील गगन दिवाण परिसरात दोन गटात जोरदार हाणामारी झाली.

यादरम्यान मोठ्या प्रमाणात रास्ता रोको करण्यात आला. वाद वाढल्यावर गोळीबारही सुरू झाला. या गोळीबारात पाच जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

या दंगलीदरम्यान हल्लेखोरांनी अनेक वाहनं पेटवून दिली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर कलम 144 लागू करून इंटरनेट सेवा (Internet Service) बंद करण्यात आली आहे.

रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान गगन दिवाण परिसरात हल्लेखोरांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काही वेळातच चेंगराचेंगरी झाली आणि जमाव अनियंत्रित झाला. लोक इकडं-तिकडं धावू लागले. यानंतर हल्लेखोरांनी डझनभर वाहनं पेटवून दिली. काही वेळातच संपूर्ण परिसराचं वातावरण बिघडलं.

हल्लेखोरांनी बेधडक गोळीबार सुरू केला. यात पाच जणांना गोळ्या लागल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचवेळी परिस्थिती चिघळल्यावर प्रशासनानं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. अफवांकडं दुर्लक्ष करून शांतता राखण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT