Supreme Court 
देश

राहुल गांधींनी बोलताना काळजी घ्यावी; राफेल प्रकरणी सरकारला दिलासा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील मोठा दिलासा देत या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिका फेटाळली आहे. तसेच न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भविष्यात या प्रकरणी काळजीपूर्वक बोलावे असेही आदेश दिले आहेत.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाचसदस्यीय खंडपीठाने या प्रकरणी आज (गुरुवार) याचिका फेटाळली आहे. राफेल विमानांच्या 58 हजार कोटी रुपयांच्या व्यवहारात गैरप्रकार झाल्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 14 डिसेंबर 2018 रोजी निर्णय दिला होता. यानुसार विमानखरेदीचा करार कायम ठेवण्यात आला होता. यानंतर या निकालावर फेरविचार याचिका दाखल केली होती. तसेच भाजप नेत्या मिनाक्षी लेखी यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतरही राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है असे म्हणत मोदींवर टीका केल्याप्रकरणी याचिका दाखल केली होती. यावरून न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले आहे.

राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या निकालाबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माध्यमांमध्ये केलेली टिप्पणी ही मूळ निकालाशी फारकत घेणारी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही म्हटले होते. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'अनिल अंबानींचा मध्यस्थ,' अशी खिल्ली उडवताना मोदींनी गोपनीयता कायद्याचे उल्लंघन केल्याची तोफ डागली होती. या प्रकरणी राहुल गांधींनी मागितलेली माफीही न्यायालयाने ग्राह्य धरली आहे. न्यायालयाने आज या प्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाच्या निर्णयांवर बोलताना विचार करून बोलावे असे राहुल गांधींना म्हटले आहे. तसेच या खरेदी व्यवहाराची चौकशीची गरज नसल्याचेही म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT