Supreme Court 
देश

राहुल गांधींनी बोलताना काळजी घ्यावी; राफेल प्रकरणी सरकारला दिलासा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील मोठा दिलासा देत या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिका फेटाळली आहे. तसेच न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भविष्यात या प्रकरणी काळजीपूर्वक बोलावे असेही आदेश दिले आहेत.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाचसदस्यीय खंडपीठाने या प्रकरणी आज (गुरुवार) याचिका फेटाळली आहे. राफेल विमानांच्या 58 हजार कोटी रुपयांच्या व्यवहारात गैरप्रकार झाल्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 14 डिसेंबर 2018 रोजी निर्णय दिला होता. यानुसार विमानखरेदीचा करार कायम ठेवण्यात आला होता. यानंतर या निकालावर फेरविचार याचिका दाखल केली होती. तसेच भाजप नेत्या मिनाक्षी लेखी यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतरही राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है असे म्हणत मोदींवर टीका केल्याप्रकरणी याचिका दाखल केली होती. यावरून न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले आहे.

राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या निकालाबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माध्यमांमध्ये केलेली टिप्पणी ही मूळ निकालाशी फारकत घेणारी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही म्हटले होते. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'अनिल अंबानींचा मध्यस्थ,' अशी खिल्ली उडवताना मोदींनी गोपनीयता कायद्याचे उल्लंघन केल्याची तोफ डागली होती. या प्रकरणी राहुल गांधींनी मागितलेली माफीही न्यायालयाने ग्राह्य धरली आहे. न्यायालयाने आज या प्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाच्या निर्णयांवर बोलताना विचार करून बोलावे असे राहुल गांधींना म्हटले आहे. तसेच या खरेदी व्यवहाराची चौकशीची गरज नसल्याचेही म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT