supreme court on internet ban in jammu and kashmir article 370 Photo Source : hindustantimes.com 
देश

काश्मीरप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले; आठवडाभरात फेरविचार करा!

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कलम 370 हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये उद्धभवलेल्या परिस्थितीवर आज, सुप्रीम कोर्टाने भाष्य केले आहे. काश्मीरमधील नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, असे सांगत केंद्राने येत्या आठवडाभरात काश्मीरमधील निर्बंधांवर पुनर्विचार करावा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. 

जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर तेथील निर्बंधांवर आक्षेप नोंदवणाऱ्या अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या आहेत. त्यावर आज, सुनावणी झाली. त्यात कोर्टानं केंद्र सरकारला फटकारलंय. सुप्रीम कोर्टानं म्हटलंय की, अनिश्चित काळासाठी इंटरनेटवर बंदी घालणं हे आपल्या घटनेत बसत नाही. हा सत्तेचा दुरुपयोग आहे. लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सर्वांत महत्त्वाचे आहे. कलम 19 (1) अंतर्गत इंटरनेट सुविधा मिळणं हा मुलभूत अधिकार आहे. सरकारने जम्मू-काश्मीरध्ये जे निर्बंध घातले आहेत. त्यावर आठवडाभरात फेरविचार करावा, असं कोर्टानं म्हटलंय. 

काश्मीरने यापूर्वी खूप हिंसाचार पाहिला आहे. सुरक्षेचा मुद्दा असला तरी, आम्ही मानवाधिकार आणि स्वातंत्र्य यांचा समतोल राखण्यासाठी योग्य ते प्रयत्न करू.
-सुप्रीम कोर्ट

काय आहे काश्मीरची परिस्थिती?

  • 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द करण्याची गृहमंत्री अमित शहांची घोषणा 
  • त्या आधीपासून काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद 
  • संवेदनशील ठिकाणी संचारबंदी 
  • ईदच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी संचालबंदी शिथील 
  • राज्यात अजूनही इंटरनेट सेवा बंद 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : मोटारसायकल चोराला अटक, तीन बाईक्स जप्त

Explained: धावताना छातीत का दुखते? डॉक्टरांनी सांगितले 'हे' 5 कारण

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT