Monsoon session Latest News
Monsoon session Latest News Monsoon session Latest News
देश

काँग्रेसच्या चार खासदारांचे निलंबन रद्द; २५ जुलै रोजी केली होती कारवाई

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : प्रचंड गदारोळ होत असताना लोकसभेने काँग्रेसच्या (Congress) चार सदस्यांचे निलंबन (Suspension) मागे घेण्याचा ठराव मंजूर केला आहे. ज्या खासदारांचे निलंबन मागे घेण्यात आले त्यांच्या नावांमध्ये मणिकम टागोर, टीएन प्रतापन, ज्योतिमणी आणि रम्या हरिदास यांचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. याआधी सोमवारी लोकसभेचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले.

लोकसभेत विविध मुद्द्यांवर गदारोळ करताना फलक दाखवणे आणि अवमान केल्यामुळे २५ जुलै रोजी काँग्रेसच्या (Congress) चार सदस्यांना चालू अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी सभागृहाच्या कामकाजातून निलंबित (Suspension) करण्यात आले होते. संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session) सुरू झाल्यापासून दोन्ही सभागृहांच्या कामकाजात गदारोळ सुरू आहे.

सरकार गंभीर विषयांवर चर्चा करीत नसल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. मात्र, सोमवारी काँग्रेस खासदारांचे निलंबन मागे घेण्यात आल्यानंतर लोकसभेचे कामकाज पूर्वपदावर आले. काँग्रेस खासदारांचे निलंबन मागे घेत लोकसभेत दुपारी महागाईवर चर्चेला सुरुवात झाली. याआधी सोमवारी लोकसभेचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले.

दोन वेळा तहकूब केल्यानंतर सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजता सुरू झाले तेव्हा अध्यक्षस्थानी उपसभापती भुवनेश्वर कलिता यांनी आवश्यक ती कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवली. त्यानंतर लगेचच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी महागाई आणि केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT