Monsoon session Latest News Monsoon session Latest News
देश

काँग्रेसच्या चार खासदारांचे निलंबन रद्द; २५ जुलै रोजी केली होती कारवाई

सरकार गंभीर विषयांवर चर्चा करीत नसल्याचा आरोप विरोधक करीत आहेत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : प्रचंड गदारोळ होत असताना लोकसभेने काँग्रेसच्या (Congress) चार सदस्यांचे निलंबन (Suspension) मागे घेण्याचा ठराव मंजूर केला आहे. ज्या खासदारांचे निलंबन मागे घेण्यात आले त्यांच्या नावांमध्ये मणिकम टागोर, टीएन प्रतापन, ज्योतिमणी आणि रम्या हरिदास यांचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. याआधी सोमवारी लोकसभेचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले.

लोकसभेत विविध मुद्द्यांवर गदारोळ करताना फलक दाखवणे आणि अवमान केल्यामुळे २५ जुलै रोजी काँग्रेसच्या (Congress) चार सदस्यांना चालू अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी सभागृहाच्या कामकाजातून निलंबित (Suspension) करण्यात आले होते. संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session) सुरू झाल्यापासून दोन्ही सभागृहांच्या कामकाजात गदारोळ सुरू आहे.

सरकार गंभीर विषयांवर चर्चा करीत नसल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. मात्र, सोमवारी काँग्रेस खासदारांचे निलंबन मागे घेण्यात आल्यानंतर लोकसभेचे कामकाज पूर्वपदावर आले. काँग्रेस खासदारांचे निलंबन मागे घेत लोकसभेत दुपारी महागाईवर चर्चेला सुरुवात झाली. याआधी सोमवारी लोकसभेचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले.

दोन वेळा तहकूब केल्यानंतर सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजता सुरू झाले तेव्हा अध्यक्षस्थानी उपसभापती भुवनेश्वर कलिता यांनी आवश्यक ती कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवली. त्यानंतर लगेचच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी महागाई आणि केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Troohy: अजिंक्य रहाणेवर चांगल्या कामगिरीचे दडपण वाढले, मुंबईचा आजपासून छत्तीसगढविरुद्ध सामन्याला सुरुवात

Brahmin Farmers : ब्राह्मण समाजातील शेतकऱ्यांच्या कूळ कायद्यातील जमीनी परत मिळाव्यात, ब्राम्हण महासंघाची मागणी

BMCसाठी भाजपचा दीडशे पारचा नारा अन् शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर; कारण काय?

Satara Doctor Case : साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; प्रशांत बनकरला घेतलं ताब्यात, आरोपींना फाशीची मागणी

Mumbai Crime : दहा वर्षे प्रेमसंबंध, ब्रेकअपनंतर भेटायला बोलावून भररस्त्यात प्रेयसीची हत्या, स्वत:लाही संपवलं

SCROLL FOR NEXT