Tea esakal
देश

केंद्राचा निर्णय; चहा-कॉफी, मसाल्यासंदर्भात कायदे लवकरच बदलणार?

आता या निर्णयावर अमंलबजावणी केव्हा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारत सरकारकडून (Central Government) लवकरच चहा, कॉफी, रबर आणि मसाल्याशी (Spices) संबंधित जुने कायदे रद्द करण्यात येणार आहेत. सरकारच्या वरिष्ठ पातळीवर तसा विचार सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. यासंदर्भातील सर्व जुने कायदे (Old laws) रद्द करून त्याजागी नवीन कायदे आणले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता या निर्णयावर अमंलबजावणी केव्हा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, याबाबत वाणिज्य मंत्रालयाने म्हटल्यानुसार, आगामी काळात चहा, कॉफी, मसाले आणि रबराशी संबंधित जुने कायदे रद्द करण्यात येणार आहेत. चहा कायदा-1953, मसाले बोर्ड कायदा-1986, रबर कायदा-1947 आणि कॉफी कायदा-1942 हे कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. सध्याच्या गरजा आणि उद्दिष्टांशी सुसंगत होण्यासाठी हे कायदे रद्द करुन नवीन कायदे आणण्याचा प्रस्ताव आहे. या चहा, कॉफी मसाले आणि रबर उत्पादनाच्या वितरणाशी संबंधित सध्या जुन्याच कायद्यांचा वापर सुरु आहे. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली असल्याने वस्तुंच्या विपणन आणि वापरामध्ये बदलही झाला आहे. शिवाय ग्राहकांची त्याप्रमाणे मागणी आहे. त्यामुळे सध्याच्या कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे.

चहा, कॉफी, मसाले आणि रबर उत्पादनाच्या विपणन आणि उत्पादनाशी संबंधित भारतामध्ये असणारे कायदे जुने आणि इंग्रजकालीन आहेत. तेव्हाच्या गरजा वेगळ्या होत्या मात्र आता त्यामध्ये बदल झाले आहेत. त्यामुळे जुने कायदे रद्द करून सध्याच्या धोरणाला सुसंगत अशा नव्या कायद्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे हे जुने कायदे बदलण्याची आवश्यकता असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT