देश

टेलिकॉम क्षेत्रात १०० टक्के FDI ला परवानगी; केंद्राचा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

टेलिकॉम क्षेत्रात ९ मोठे बदल केले जात आहेत. यामध्ये एजीआरची व्याख्या बदलण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने टेलिकॉम क्षेत्रात ऑटोमिक रुटच्या माध्यमातून १०० टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. टेलिकॉम क्षेत्रात ९ मोठे बदल केले जात आहेत. यामध्ये एजीआरची व्याख्या बदलण्यात येणार आहे. यामुळे बिगर टेलिकॉम रिव्हेन्यू रद्द होईल.

टेलिकॉम ऑपरेटर्सनची जी काही थकीत बाकी आहे त्यावर चार वर्षांच्या मॉरेटोरियमला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र , ऑपरेटर्सना मॉरेटोरियम कालावधीत व्याज द्यावं लागेल. कॅबिनेटने एजीआरची व्याख्येत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असून त्याअंतर्गत दंड रद्द केला जाईल अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.

स्पेक्ट्रमचा लिलाव होईल त्यानुसार कंपन्यांना स्पेक्ट्रम ३० वर्षांसाठी ठेवण्याची परवानगी असेल. ग्राहकांच्या केवायसी फॉर्मचे आता डिजिटायझेशन होईल. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा फॉर्म किंवा कागद आणण्याची गरज नसेल असेही अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT